सोमवार, ११ नोव्हेंबर
मुंबई – विधानसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराविरुद्ध बंडखोरी करणाऱ्या राज्यातील २१ जणांवर काँग्रेस पक्षाने ६ वर्षांसाठी निलंबनाची मोठी कारवाई केली आहे. निलंबनाची कारवाई करण्यात आलेल्यामध्ये अहमदनगर शहरमधून मंगल विलास भुजबळ यांचा देखील समावेश आहे.
काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या आदेशावरून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशाने ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती काँग्रेसचे उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे यांनी दिली आहे.
विधानसभा निवडणुकीत १६ मतदार संघात महाविकास आघाडीचे उमेदवार तसेच काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारांविरोधात बंडखोरी झाले आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाने या सर्व बंडखोरांवर सहा वर्षांसाठी निलंबनाची कारवाई केली.
या बंडखोर उमेदवारांवर झाली निलंबनाची कारवाई… (कंसात मतदार संघ)
आनंदराव गेडाम, श्रीमती शिलू चिमुरकर (आरमोरी)
श्रीमती सोनल कोवे, भरत येरमे (गडचिरोली)
श्रीमती अभिलाषा गावतुरे, राजू झोडे (बल्लारपूर)
प्रेमसागर गणवीर (भंडारा)
अजय लांजेवार (अर्जुनी मोरगाव)
विलास रघुनाथ पाटील, श्रीमती आसमा चिखलेकर (भिवंडी)
हंसकुमार पांडे (मीरा-भाईंदर)
श्रीमती कमल व्यवहारे (कसबापेठ पुणे)
मोहनराव दांडेकर (पलूस कडेगाव)
मंगल विलास भुजबळ (अहमदनगर शहर)
मनोज शिंदे, सुरेश पाटीलखेडे (कोपरी पाचपाखडी)
विजय खडसे (उमरखेड)
शबीर खान (यवतमाळ)
अविनाश लाड (राजापूर)
याज्ञवलक्य (जिचकार काटोल)
राजेंद्र मुळक (रामटेक)

