रविवार, १७ नोव्हेंबर
येत्या २० तारखेला विधानसभा निवडणूक होत आहे. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी निवडणूक आयोगाने प्रशासनाकडून सातत्याने प्रयत्न होताना दिसतात. मात्र मतदानाच्या दिवशी मिळालेल्या सुट्ट्यांचा गैरफायदा घेत मतदान न करता अनेक जण बाहेरगावी सहलीसाठी जातात आणि त्याचा परिणाम मतदानावर होतो. निवडणुकीनंतर सध्याच्या राजकारणाला कंटाळल्याने मतदान न केल्याचे अनेक जण सांगतात. मात्र यामुळे निवडणुकीत मतदानाचा टक्का घसरतो, त्यामुळे उमेदवार मान्य नसेल तर मतदान यंत्रावरील नोटाचे बटन दाबा मात्र मतदान आवश्य करा, मतदानाचे पवित्र कर्तव्य पूर्ण करा, असं आवाहन उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे शिवसैनिक दीपक साळुंके यांनी केल आहे.
बहुतेक मतदार संघात प्रमुख उमेदवारांच्या मतानंतर नोटाच्या मतांचा समावेश गेल्या काही निवडणुकांपासून दिसत आहे. अगदी नोटाच्या मतदारांनी तिसऱ्या क्रमांकापर्यंत उडी मारली आहे. त्यामुळे या निवडणुकीत देखील नोटांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
मतदानाची टक्केवारी नेहमीच चिंतेचा विषय राहिली आहे. मतदानावेळी अनेकांमध्ये निरुत्साह असतो. मात्र आपल्या एका मताने सरकार बनत असते. मला काय त्याचे असे म्हणत जर आपण मतदानापासून दूर राहिलो तर त्याचे परिणाम आपल्यालाच भोगावे लागतात. आपल्या मतांवर निवडून जाणारे लोकप्रतिनिधी आपल्यासाठी काम करत असतात. आपण त्यांना वेळप्रसंगी जाबही विचारू शकतो.
मतदान हा प्रत्येकाचा महत्त्वाचा हक्क आणि अधिकार आहे. आपल्या अधिकाराचा वापर प्रत्येक भारतीय नागरिकाने केला पाहिजे, तरच लोकशाही टिकून राहील. चांगले राज्यकर्ते निवडून देण्यासाठी प्रत्येक मत महत्त्वाचे आहे, पण तुम्हाला जर निवडणुकीमध्ये उभा असलेला कोणताही उमेदवार योग्य वाटत नसेल तर तुम्ही नोटा हा पर्याय वापरू शकता. पण, काहीही झाले तरी मतदान करणे अत्यंत आवश्यक आहे.
NOTA म्हणजे None Of The Above. वरीलपैकी कोणताच उमेदवार पसंत नसेल तर सर्वांत खाली एक बटण असतं. ते दाबलं तर वरीलपैकी कोणताच उमेदवार पसंत नाही असं मत देता येतं.


NOTA म्हणजे None Of The Above. वरीलपैकी कोणताच उमेदवार पसंत नसेल तर सर्वांत खाली एक बटण असतं. ते दाबलं तर वरीलपैकी कोणताच उमेदवार पसंत नाही असं मत देता येतं.