Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

रविवार विशेष लेख: मोदी नेहरूंशी बरोबरी करू शकतात?

June 14, 2026

आज रविवार, १४ जून २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

June 14, 2026

गाव आणि शेतकरी समृद्ध झाल्याशिवाय देश महासत्ता होणार नाही: भास्करराव पेरे पाटील

June 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » आचारसंहिता काळातही प्रशासन दबावाखाली… निवडणूक आयोगाकडे केल्या तक्रारी – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात
निवडणूक

आचारसंहिता काळातही प्रशासन दबावाखाली… निवडणूक आयोगाकडे केल्या तक्रारी – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात

थोरात यांची पत्रकार परिषद
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरNovember 19, 2024Updated:November 19, 2024No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

अहिल्यानगर जिल्ह्यात बाराच्या बारा जागी महाविकास आघाडी निवडून येणार
३५ वर्ष सत्ता असून राहत्याचा विकास का नाही? 
एका व्यासपीठावर येण्याचे आव्हान देऊ नये ते का स्वीकारले नाही?
काहींनी संगमनेरला रणभूमी करण्याचे ठरविले होते
शिर्डीच्या हॉस्पिटलला कोण अडथळे आणतय

मंगळवार १९ नोव्हेंबर 

संगमनेर – आचारसंहिता काळातही जिल्हा प्रशासन कोणाच्यातरी दबावाखाली काम करत असून एकतर्फीपणे वागत आहे. राजकारणासाठी जनतेच्या प्रश्नांची कोणी खेळू नये असे सांगत यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे तीन तक्रारी केल्याची माहिती राज्याचे माजी मंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी दिली.

राज्यात विधानसभा निवडणूक प्रचाराची सोमवारी सायंकाळी सांगता झाली तत्पूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत थोरात बोलत होते. यावेळी तालुका काँग्रेस अध्यक्ष जयश्री थोरात उपस्थित होत्या. पत्रकारांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना थोरात म्हणाले मी राज्यभर प्रचारानिमित्त दौरे केले. राज्यात महाविकास आघाडी १८० पेक्षा अधिक जागांवर विजयी होईल तर अहिल्यानगर जिल्ह्यातील बाराही जागांवर महाविकास आघाडीला विजय मिळेल. राज्यामध्ये महागाई, बेरोजगारी, प्रचंड वाढली आहे. शेतीमालाला भाव नाही. दुधाला भाव नाही. इंधन दरवाढ, ठप्प झालेला विकास यामुळे जनतेच्या मनात प्रचंड रोष आहे.

मी राज्यात फिरत असताना काहींनी संगमनेरला रणभूमी करण्याचे ठरविले होते. मात्र माझ्या गैरहजरच्या काळात संगमनेर तालुक्याची जबाबदारी कार्यकर्त्यांनी सांभाळली आहे. निवडणुकीनंतर मीच पुन्हा येथील आमदार असेल. शेजारच्या नेत्यांना एका व्यासपीठावर येऊन विकासासंदर्भात चर्चा करण्याचे आव्हान दिले होते. मात्र त्यांनी ते आव्हान स्वीकारले नाही. ३५ वर्ष एका घरात सत्ता, खासदार, मंत्री, आमदार, विरोधी पक्षनेते, जिल्हा परिषद अध्यक्ष अशी पदे असताना देखील त्यांना राहता तालुक्याचा विकास करता आला नाही.

नगर-मनमाड रस्त्याची मोठी दुरवस्था असून यामुळे हजारो नागरिकांचे प्राण गेले आहे. साई संस्थानमधील ५९८ कर्मचाऱ्यांचा प्रश्न प्रलंबित आहेत. शहराचा आराखडा विकसित झालेला नाही. साई संस्थांनचे सुसज्ज हॉस्पिटल असताना खाजगी २०० बेडचे हॉस्पिटल निर्माण करण्याची गरज काय. असे विचारताना साई संस्थान मोठे शैक्षणिक संकुल उभे करू शकले असते मात्र तेथे ते होऊ दिले जात नाही. संस्थांच्या कारभारामध्ये बेकायदेशीरपणे हस्तक्षेप केला जातो आहे.

मूळचे भाजपचे कार्यकर्ते यांची दुरवस्था करून टाकली आहे. शिर्डीच्या अनेक जमिनींवर आरक्षण टाकून जनतेला वेठीस धरले आहे. शिर्डीमध्ये अवैध धंदे, गुन्हेगारी वाढली आहे. हे सर्व थांबवायचे असेल तर सर्वांनी आपला स्वाभिमान जिवंत ठेवून प्रभावती घोगरे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले पाहिजे.

संगमनेरमध्ये ज्याप्रमाणे शांतता, सुव्यवस्था आणि विकास आहे. तसे काम राहता तालुक्यात करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. राहता तालुक्यातील प्रश्नांसाठी वेळेला रस्त्यावर उतरायची वेळ आली तरी मी तयार आहे. ही राहता तालुक्यातील जनतेच्या स्वातंत्र्याची लढाई असून सर्वांनी सहभागी होऊन घोगरे यांना निवडून देण्याचे आवाहन केले.

आचारसंहितेच्या काळातही प्रशासन कुणाच्यातरी दबावाखाली… यावर्षी सर्वत्र चांगला पाऊस झाला आहे. धरणांमध्ये चांगला पाऊस आहे. असे असतानासुद्धा आमच्या तळेगाव पाणीपुरवठा योजनेसाठी पाणी दिले जात नाही. लोकप्रतिनिधी या नात्याने वारंवार मागणी करून सुद्धा प्रशासन ही मागणी टाळत आहे. राजकारणासाठी जनतेशी कोणी खेळू नये. प्रशासन कुणाच्या दबावाखाली आहे हे कळाले पाहिजे. लोकशाहीमध्ये प्रशासनाने असे एकतर्फी वागणे अत्यंत चुकीची आहे. प्रशासनाने नेहमी जनतेच्या हितासाठी काम केले पाहिजे.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 590
पत्रकार परिषद बाळासाहेब थोरात
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

पवारांची राष्ट्रवादी अन् काँग्रेसची विचारधारा एकच, फक्त… माजी मंत्री बाळासाहेब थोरात

June 12, 2026

यशोधन कार्यालयात ‘एसटी स्मार्ट कार्ड’ सुविधेचा शुभारंभ; ज्येष्ठ नागरिक व महिलांना प्रवासात मिळणार मोठी सवलत

June 9, 2026

वृक्ष संवर्धन ही काळाची गरज; तापमान वाढ रोखण्यासाठी प्रत्येकाने दोन झाडे लावावीत: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

June 5, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
विश्लेषण

रविवार विशेष लेख: मोदी नेहरूंशी बरोबरी करू शकतात?

By अनंत पांगारकरJune 14, 20260

पंतप्रधानपदाचा सर्वाधिक काळ कारभार केल्याच्या कारणास्तव नरेंद्र मोदी यांचा सुरू असलेला उत्सव कमालीचा चर्चेचा बनला…

आज रविवार, १४ जून २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

June 14, 2026

गाव आणि शेतकरी समृद्ध झाल्याशिवाय देश महासत्ता होणार नाही: भास्करराव पेरे पाटील

June 13, 2026

बनावट दारू तयार करणाऱ्यावर राज्य उत्पादन शुल्काची मोठी कारवाई; १ लाख ४६ हजारांचा मुद्देमाल जप्त

June 13, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.