
मुंबई, दि. ६ मार्च –
युवकांच्या रोजगारासाठी संगमनेरमध्ये स्वतंत्र औद्योगिक निर्माण शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन कृषी प्रक्रिया उद्योग आणि शितगृहाची उभारणी करावी, नासिक पुणे रेल्वे मार्ग प्रस्तावित आराखड्याप्रमाणे संगमनेरमधून नेला जावा, यासह विविध मागण्या आमदार अमोल खताळ यांनी अधिवेशनामध्ये बुधवारी केल्या आहे.
राज्यपालांच्या अभीभाषणावर आभार दर्शक ठरावावेळी खताळ बोलत होते. राज्याच्या विकासासाठी महायुती सरकार कटिबद्ध असून, त्यादृष्टीने होत असलेल्या निर्णयाचे आणि धोरणांचे त्यांनी स्वागत केले.
महाराष्ट्र राज्य हे देशाच्या आर्थिक विकासाचा स्तंभ असून,राज्याला औदयोगीक विकास, कृषी परंपरा मोठी आहे. त्याला गती देण्याचे काम शासनाच्या माध्यमातून होत असल्याचे सांगत महायुती सरकारच्या माध्यमातून संगमनेर तालुक्यात स्वतंत्र औद्योगिक वसाहतीचा प्रस्ताव मंजूर करावा अशी मागणी केली. औद्योगिक गुंतवणुकीच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य आकर्षक ठरत आहे. एकूण १५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक राज्याच्या उद्योग क्षेत्रात होत असल्याने रोजगाराच्या संधी निर्माण होतील अशी अपेक्षा व्यक्त केली.

संगमनेर तालुक्यात औद्योगिक वसाहत मंजूर झाल्यास तालुक्यातील युवकांना रोजगारांच्या संधी निर्माण होऊ शकतील. पारंपारिक पिकांच्या उत्पादनाबरोबरच कृषी प्रक्रिया उद्योग आणि शीतगृहाची उभारणी झाल्यास शेतकऱ्यांना त्याचा मोठा लाभ होईल, याकडे लक्ष वेधले. राज्य सरकारने मागेल त्याला सौरपंप योजना सुरु केली. यामुळे विजेच्या प्रश्नावर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल. तालुक्यातील शेतकऱ्यांनी यासाठी अर्ज दाखल केले आहेत. मात्र डार्क झोनची अट सांगून शेतकऱ्यांची होणारी अडवणूक आणि भूजलचे दाखले देण्याची अट शिथिल करावी अशी मागणी केली.
केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. यासाठी नेमलेल्या समितीचे अध्यक्ष प्रा. रंगनाथ पठारे हे संगमनेर मतदार संघातील असून राज्य सरकारने त्यांच्या सन्मानाचा कार्यक्रम संगमनेर येथे होण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी केली.

आमदार खताळ यांच्या अधिवेशनात सरकारकडे विविध मागण्या
केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. यासाठी नेमलेल्या समितीचे अध्यक्ष प्रा. रंगनाथ पठारे हे संगमनेर मतदार संघातील असून राज्य सरकारने त्यांच्या सन्मानाचा कार्यक्रम संगमनेर येथे होण्यासाठी पुढाकार घ्यावा

