
मुंबई, दि. १० मार्च
“महाराष्ट्र आता थांबणार नाही..”राज्य सरकारचा वादा पूर्ण करणारा असा हा अर्थसंकल्प असल्याचे स्पष्ट करत राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी व जनकल्याणासाठी आज सादर झालेला अर्थसंकल्प महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे, अशी प्रतिक्रिया संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केली आहे.
अर्थमंत्री अजित पवार यांनी सभागृहात सोमवारी (१० मार्च) २०२५-२६ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पाबाबत खताळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सादर झालेल्या अर्थसंकल्पाचे स्वागत करत खताळ म्हणाले, राज्याच्या गोरगरीब, शेतकरी, महिला तरुण आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी महायुती सरकारने अर्थसंकल्पात भरीव तरतूद केली आहे. हा अर्थसंकल्प राज्यातील ग्रामीण भागाचा विकास, शेतकरी कल्याण, महिला सशक्तिकरण, शिक्षण, रोजगार आणि पायाभूत सुविधा यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रात नवी दिशा देणारा आहे. शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी, सौर ऊर्जा योजना, महिला सशक्तिकरण योजनांमध्ये वाढ, तरुणांसाठी रोजगार निर्मिती करिता अर्थसंकल्पात भरीव तरतूद केल्याने अनेक वंचित घटकांना यातून लाभ होईल.
राज्यातील पायाभूत विकासासाठी चालना देण्याकरता मोठ्या प्रमाणावर भरे निधीची तरतूद करण्यात आली आहे. उद्योगांना प्रोत्साहन, घरकुल उद्दिष्टे तसेच शैक्षणिक मदतीची नवी पावले राज्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरतील. अर्थसंकल्पात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने राज्याच्या प्रगतीला गती देणारे आणि प्रत्येक नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा घडविणारे निर्णय घेतले आहे. त्यामुळे हा अर्थसंकल्प राज्याच्या उज्वल भविष्यासाठी दिशादर्शक ठरेल.

सर्वांगीण विकासाला पुढे नेणारा अर्थसंकल्प : आमदार अमोल खताळ
"महाराष्ट्र आता थांबणार नाही.."राज्य सरकारचा वादा पूर्ण करणारा असा हा अर्थसंकल्प असल्याचे स्पष्ट करत राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी व जनकल्याणासाठी आज सादर झालेला अर्थसंकल्प महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे

