Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

शासकीय कामात अडथळा आणणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल; प्रशासकीय कारवाईदरम्यान राडा

June 4, 2026

सहा मटका अड्ड्यांवर पोलिसांचे छापे; दीड लाखांचा मुद्देमाल जप्त, १० जण ताब्यात

June 4, 2026

“वाकचौरे आता थांबणार नाहीत…!” – एका विधानाने पेटलेली राजकीय चर्चा

June 4, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संत विचारांमुळे समाज एकसंध राहतो: पालकमंत्री विखे
धार्मिक

संत विचारांमुळे समाज एकसंध राहतो: पालकमंत्री विखे

दोन दिवसीय संत साहित्य संमेलनाचा समारोप २३ मार्च रोजी होणार आहे. या संमेलनाला राज्यातून मोठ्या संख्येने वारकरी आणि संत अभ्यासक उपस्थित झाले आहेत.
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरMarch 22, 2025No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

शिर्डी, दि. २२ मार्च – 

संत साहित्य आणि विचारांमधून समाजात एकतेचा संदेश दिला जातो. संतांची भूमिका नेहमीच लोकांच्या कल्याणासाठी असते. संत साहित्य जोपर्यंत जिवंत राहील, तोपर्यंत समाजातील विषमता नष्ट होईल आणि एकता निर्माण होईल. संत विचारांमध्ये समाजाला एकत्र ठेवण्याची ताकद आहे, असे राज्याचे जलसंपदा आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

वारकरी साहित्य परिषदेतर्फे आयोजित १३ व्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाला शिर्डी येथे सुरुवात झाली. या कार्यक्रमाला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ, संमेलनाध्यक्ष ह.भ.प. संजय महाराज देहूकर, मागील संमेलनाचे अध्यक्ष ह.भ.प. माधव महाराज शिवणीकर, वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील, सचिव आणि संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे, ह.भ.प चकोर महाराज बावीस्कर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्री विखे म्हणाले, श्री साईबाबांच्या शिर्डी नगरीत संत साहित्य संमेलनाचे आयोजन करणे ही जिल्हा वासियांसाठी भाग्याची गोष्ट आहे. संत साहित्यातून सामाजिक एकतेचा संदेश देण्यात येतो. संतांची भूमिका नेहमीच लोककल्याणाची असते. मराठी भाषा आणि तिच्या बोलीभाषांमध्ये संत साहित्याचे प्रतिबिंब दिसते. संत साहित्य समाजाच्या उन्नतीसाठी आहे.

संत साहित्य जिवंत राहिले, तर समाजातील विषमता नष्ट होऊन एकता निर्माण होईल. संत साहित्यात समाजाला एकत्र ठेवण्याची ताकद असल्याने प्रत्येकाने संत साहित्य वाचले पाहिजे. या साहित्यातून अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पाया भक्कम करण्याचे काम झाले आहे. संतांनी आपल्याला समाज सुधारणेचा मंत्र दिला आहे. संत साहित्याच्या माध्यमातून निद्रिस्त समाजाला जागृत करण्याचे काम झाले आहे. ही परंपरा पुढे नेत असताना लोकशिक्षण आणि लोकजागृतीचे काम संत आणि वारकरी निश्चितपणे करतील, अशी अपेक्षा विखे यांनी व्यक्त केली.

रामदास आठवले म्हणाले, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. वारकरी संतांच्या विचारांचा वारसा घेऊन काम करतात. वारकरी माणसांचे कल्याण करतात आणि सुखदुःखात जगण्याचा मंत्र देतात. संत आणि वारकरी नसते, तर समाज व्यवस्था टिकली नसती. माणसाच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचे आणि समाज एकत्र ठेवण्याचे काम संत आणि वारकऱ्यांनी केले आहे. वारकऱ्यांमध्ये महिलांची संख्या लक्षणीय आहे. समाजातील वाईट गोष्टी नष्ट करण्यासाठी संत आणि वारकऱ्यांनी समाजप्रबोधन आणि संस्काराचे काम प्रभावीपणे करावे.

संजय शिरसाठ म्हणाले, संत आणि वारकरी संस्कृती टिकवण्याचे काम करतात. वारकऱ्यांच्या माध्यमातून आध्यात्मिक वारसा सामान्य लोकांपर्यंत पोहोचतो, आणि समाजातील सांस्कृतिक मूल्यांचे जतन होते. राजसत्ता आणि धर्मसत्तेच्या समन्वयाने समाजात चांगले बदल घडवून आणण्याचे काम झाले पाहिजे.

वारकरी साहित्य संमेलनाला सामाजिक न्याय विभागाने २५ लाख रुपयांची आर्थिक मदत दिली आहे. सर्व वारकरी दिंड्यांना प्रत्येकी २० हजार रुपयांची शासनाकडून मदत दिली जाईल. संत साहित्य आणि वारकऱ्यांना आवश्यक ते सहकार्य शासनातर्फे केले जाईल.

संमेलनाध्यक्ष देहूकर महाराज म्हणाले, संत साहित्य आणि वारकरी संप्रदाय हे मराठी संस्कृती आणि भक्ती परंपरेचे महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत. वारकरी संप्रदाय भगवान विठ्ठलाच्या भक्तीवर आधारित आहे, आणि संतांनी रचलेले साहित्य भक्ती, ज्ञान आणि समाज प्रबोधनाचे माध्यम बनले आहे.

यावेळी ह.भ.प माधव महाराज शिवणीकर आणि सदानंद मोरे यांची भाषणे झाली. प्रास्ताविकात विठ्ठल पाटील यांनी वारकरी संत साहित्य संमेलन आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली.

संमेलनाच्या उद्घाटनापूर्वी, साईबाबा समाधी मंदिर ते संमेलनस्थळ शेती महामंडळ मैदानापर्यंत वारकरी दिंडी काढण्यात आली. दिंडीची सांगता अश्व रिंगणाने करण्यात आली. दोन दिवसीय संत साहित्य संमेलनाचा समारोप २३ मार्च रोजी होणार आहे. या संमेलनाला राज्यातून मोठ्या संख्येने वारकरी आणि संत अभ्यासक उपस्थित झाले आहेत.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 697
अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन राधाकृष्ण विखे रामदास आठवले शिर्डी संजय शिरसाठ
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

मान्सूनपूर्व तयारी व पाणीटंचाई निवारणासाठी यंत्रणांनी संवेदनशील राहावे; पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांचे प्रशासनाला निर्देश

May 15, 2026

संगमनेरात महात्मा बसवेश्वर जयंती मोठ्या उत्साहात साजरी; लिंगायत जंगम समाज बांधवांचा मोठा सहभाग

April 20, 2026

निझर्णेश्वर मंदिर देवस्थान होणार संगमनेर तालुक्यातील प्रमुख पर्यटन केंद्र; पालकमंत्री विखे

April 19, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

शासकीय कामात अडथळा आणणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल; प्रशासकीय कारवाईदरम्यान राडा

By अनंत पांगारकरJune 4, 20260

विशेष प्रतिनिधी | संगमनेर: शहरातील वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या भाजीपाला विक्रेत्यांच्या अतिक्रमणांवर पालिकेने धडक कारवाईचा बडगा…

सहा मटका अड्ड्यांवर पोलिसांचे छापे; दीड लाखांचा मुद्देमाल जप्त, १० जण ताब्यात

June 4, 2026

“वाकचौरे आता थांबणार नाहीत…!” – एका विधानाने पेटलेली राजकीय चर्चा

June 4, 2026

रोटरी क्लबच्या जयपूर फूट वितरण उपक्रमातून दिव्यांगांना स्वावलंबनाची नवी दिशा; संगमनेरमध्ये ११४ दिव्यांगांना कृत्रिम अवयवांचे वाटप

June 4, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.