
ठाणे, दि. २४ मार्च – प्रतिनिधी
संगमनेरमधील डॉ. सुधाकर पेटकर यांना राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले साहित्य भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. ठाण्यामध्ये नुकत्याच पार पडलेल्या कार्यक्रमात डॉ. पेटकर यांचा गौरव करण्यात आला.

अखिल भारतीय मराठी साहित्य चळवळीचे मुख्य केंद्र असलेल्या मराठी साहित्य मंडळाच्या वतीने ठाण्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या ३४ राज्यस्तरीय काव्य संमेलनात ज्येष्ठ साहित्यिक व मराठी साहित्य मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. जयप्रकाश घुमटकर यांच्या हस्ते डॉ. पेटकर यांना या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
डॉ. सुधाकर पेटकर यांचे ‘चंदनाचे हात’ हे आत्मचरित्र नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. या पुस्तकाची प्रस्तावाना जयहिंद लोकचळवळीचे संस्थापक डॉ. सुधीर तांबे यांनी लिहिली आहे. डॉ. पेटकर यांच्या आत्मचरित्राला विविध संस्थांच्यावतीने गौरविण्यात आले आहे.


