अमृतवाहिनी बँकेचा देश पातळीवर डंका; ‘भारतरत्न सहकारिता’सह तीन राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित
आधुनिक डिजिटल प्रणाली, अचूक कामकाज, तत्पर ग्राहक सेवा, उत्कृष्ट व्यवस्थापन आणि सुमारे १२०० कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल या बळावर राष्ट्रीय स्तरावर हे यश संपादन केले आहे



अमृतवाहिनी बँकेने आधुनिक डिजिटल प्रणाली, अचूक कामकाज, तत्पर ग्राहक सेवा, उत्कृष्ट व्यवस्थापन आणि सुमारे १२०० कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल या बळावर राष्ट्रीय स्तरावर हे यश संपादन केले आहे. चेअरमन सुधाकर जोशी यांच्या नियोजनातून बँकेची गुणवत्ता वाढली असून, मुख्य कार्यकारी अधिकारी सुशील गुजराती यांच्या कुशल प्रशासनामुळे बँकेने आर्थिक शिस्त राखली आहे.

