Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अपुऱ्या पावसामुळे पाणी जपून वापरण्याचे जलसंपदा मंत्र्यांचे आवाहन; ३१ ऑगस्टपर्यंत पिण्याचे पाणी निश्चित करण्याचे मंत्री विखे पाटलांचे निर्देश

June 14, 2026

रविवार विशेष लेख: मोदी नेहरूंशी बरोबरी करू शकतात?

June 14, 2026

आज रविवार, १४ जून २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

June 14, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » शहरातील शुद्ध व थंड पाण्याचे एटीएम सुरू करण्याची शिवसेनेची मागणी
राजकारण

शहरातील शुद्ध व थंड पाण्याचे एटीएम सुरू करण्याची शिवसेनेची मागणी

मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून हे एटीएम बंद आहे. त्यामुळे नागरिकांना शुद्ध आणि थंड पाणी उपलब्ध होत नाही. आता उन्हाळ्याची तीव्रता वाढत असल्याने नागरिकांना अल्प दरात शुद्ध आणि थंड पाणी उपलब्ध व्हावे
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरMarch 27, 2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, दि. २७ मार्च – प्रतिनिधी 

मार्च अखेर ऊन चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्यासह इतर भागातून संगमनेर मध्ये येणाऱ्या नागरिकांना शुद्ध व थंड पाणी उपलब्ध व्हावे यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून बंद असलेले पिण्याच्या शुद्ध व थंड पाण्याचे एटीएम सुरू करण्याची मागणी शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रभारी शहराध्यक्ष रवींद्र कानकाटे यांनी केली आहे.

संगमनेर नगर परिषदेने एका खाजगी एजन्सी मार्फत शहरात बहुतांश ठिकाणी शुद्ध आणि थंड पाण्याचे एटीएम बसविले आहे. मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून हे एटीएम बंद आहे. त्यामुळे नागरिकांना शुद्ध आणि थंड पाणी उपलब्ध होत नाही. आता उन्हाळ्याची तीव्रता वाढत असल्याने नागरिकांना अल्प दरात शुद्ध आणि थंड पाणी उपलब्ध व्हावे यासाठी हे एटीएम संगमनेर नगर परिषदेने संबंधित ठेकेदारामार्फत पुन्हा सुरू करण्याची गरज आहे.

तत्कालीन नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या पाण्याच्या एटीएम मधून नागरिकांना एक रुपयात एक लिटर थंड आणि शुद्ध पाणी मिळत होते. शहरात बाहेरून येणाऱ्या नागरिकांसाठी हा उपक्रम अतिशय उपयोगी असा ठरला होता. याशिवाय या एटीएम मधून बहुतेक व्यावसायिक देखील पाण्याचे जार भरून नेत असत. त्यामुळे हॉटेलमधील अस्वच्छ टाक्यांमधील पाणी पिण्याऐवजी नागरिकांना स्वच्छ पाणी मिळत असे.

शहराच्या विविध भागात फिल्टर पाण्याचे हे एटीएम मशीन बसविण्यात आले होते. मात्र सध्या ते बंद अवस्थेत आहे. उपनगरातील मुख्य सेंटरमधून शुद्ध केलेले पाणी या एटीएममध्ये टाकले जात होते. केवळ नागरिकांनाच नव्हे तर व्यावसायिकांना देखील या एटीएम मशीनचा फायदा होत होता.

आता उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने नगरपरिषदेने पाण्याचे हे एटीएम मशीन पुन्हा सुरू केल्यास नागरिकांना थंड आणि शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध होईल. त्यामुळे नगर परिषदेने यात लक्ष घालून हे एटीएम सुरू करावे अन्यथा यासाठी शिवसेनेला आंदोलन करण्याची वेळ आणू नये असे देखील कानकाटे यांनी म्हटले आहे.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 697
पाण्याचे एटीएम रविंद्र कानकाटे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

पवारांची राष्ट्रवादी अन् काँग्रेसची विचारधारा एकच, फक्त… माजी मंत्री बाळासाहेब थोरात

June 12, 2026

लाडकी बहीण योजना की समाज कल्याणच्या निधीवर ‘डल्ला’? उत्कर्षा रूपवते यांचा सरकारवर घणाघाती आरोप

June 12, 2026

घुलेवाडी सरपंच व तीन सदस्यांच्या अपात्रतेला अप्पर विभागीय आयुक्तांची स्थगिती; जिल्हाधिकार्‍यांच्या निर्णयाविरोधात दिलासा

June 4, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
बैठक

अपुऱ्या पावसामुळे पाणी जपून वापरण्याचे जलसंपदा मंत्र्यांचे आवाहन; ३१ ऑगस्टपर्यंत पिण्याचे पाणी निश्चित करण्याचे मंत्री विखे पाटलांचे निर्देश

By अनंत पांगारकरJune 14, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन पुणे:  राज्यातील अपुऱ्या पर्जन्यमानाची पार्श्वभूमी आणि धरणांमधील खालावलेला पाणीसाठा लक्षात घेऊन…

रविवार विशेष लेख: मोदी नेहरूंशी बरोबरी करू शकतात?

June 14, 2026

आज रविवार, १४ जून २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

June 14, 2026

गाव आणि शेतकरी समृद्ध झाल्याशिवाय देश महासत्ता होणार नाही: भास्करराव पेरे पाटील

June 13, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.