
संगमनेर, दि. ८ एप्रिल – प्रतिनिधी
तालुक्यातील अंभोरे गावातील वीज, पाणी आणि रस्त्यांसारख्या मूलभूत समस्या प्राधान्याने सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध राहू, असा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी अंभोरे ग्रामस्थांना दिला.
अंभोरे येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाच्या सांगता कार्यक्रमाला आमदार अमोल खताळ यांनी भेट दिली. या वेळी सप्ताह समितीच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. ग्रामस्थांनी गावातील गंभीर वीज, पाणी व रस्त्यांच्या समस्या त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या.
खताळ म्हणाले, अंभोरे गावाच्या सर्वांगीण विकासासाठी मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आपण नेहमीच तत्पर राहू. आध्यात्मिक, सामाजिक आणि कृषी क्षेत्रातील विविध विकासकामे लवकरच पूर्ण केली जातील.

या कार्यक्रमाला संपत गोविंद खेमनर, अनिल शिवराम खेमनर, अँड. संदीप जगनर, शिवाजी खेमनर, रावसाहेब रावजी सोपान राधू खेमनर, उमा मारुती खेमनर, बाबुराव गवाजी खेमनर, नागेश भास्कर हळनर, देवराम पुणेकर, रमेश बलसाने, नकाजी कडनर, दीपक कडनर यांच्यासह अनेक ग्रामस्थ आणि भजनी मंडळाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाला अंभोरे पंचक्रोशीतील भाविक, ग्रामस्थ, महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार अमोल खताळ यांनी अंभोरे येथील प्रगतशील शेतकरी शरद शिवाजी खेमनर यांच्या शेतात मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेचे उद्घाटन केले. या वेळी बोलताना ते म्हणाले की, सौर पंपांमुळे शेतकऱ्यांना दिवसा सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणे शक्य होणार असल्याने ही योजना शेतकऱ्यांसाठी निश्चितच वरदान ठरेल. त्यांनी अधिकाधिक शेतकऱ्यांनी या योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन केले.



