Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

एलसीबीची छापेमारी, २.९९ लाखांचा मुद्देमाल जप्त करत १४ आरोपींवर गुन्हा दाखल

29/08/2026

देशहितासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी..; संगमनेरच्या वकिलाचे जगातील सर्वात उंच पोस्ट ऑफिसमधून थेट पत्र!

29/08/2026

आज शनिवार, २९ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

29/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » श्रद्धास्थानाचे राजकारण: हनुमान रथ मिरवणूक आणि रथावरील नामफलकानी पेटवले वादंग! युवकांचा पारा चढला! केला मोठा आरोप…
धार्मिक

श्रद्धास्थानाचे राजकारण: हनुमान रथ मिरवणूक आणि रथावरील नामफलकानी पेटवले वादंग! युवकांचा पारा चढला! केला मोठा आरोप…

काही ठराविक लोकांकडून ग्रामदैवताच्या या महत्त्वपूर्ण उत्सवाचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी आणि खासगी मालमत्तेसारखा केला जात आहे, यामागे काही लोकांचा राजकीय स्वार्थ दडलेला असल्याचा गंभीर आरोपही या युवकांकडून निवेदनात करण्यात आला आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar29/04/2025No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर:
संगमनेरकरांचे ग्रामदैवत असलेल्या हनुमान जयंती उत्सवात चांगलाच गदारोळ झाला. या संदर्भात पंधरा दिवसांच्या अंतरानंतर तब्बल दोन्ही गटाकडून परस्पर विरोधी फिर्यादी दाखल झाल्यानंतर आता हनुमान विजय रथावर जयंती उत्सव समितीच्या काही पदाधिकाऱ्यांनी कायमस्वरूपी नावाच्या पाट्या लावल्याने हिंदुत्ववादी युवक संतप्त झाले आहेत. युवक कार्यकर्त्यांनी या कृत्याचा तीव्र निषेध नोंदवत, हनुमान जयंती आणि विजय रथ जणू काही खासगी मालमत्ता असल्याप्रमाणे वापरले जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
काही ठराविक लोकांकडून ग्रामदैवताच्या या महत्त्वपूर्ण उत्सवाचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी आणि खासगी मालमत्तेसारखा केला जात आहे, यामागे काही लोकांचा राजकीय स्वार्थ दडलेला असल्याचा गंभीर आरोपही या युवकांकडून निवेदनात करण्यात आला आहे.
वादाला तोंड फुटले… हनुमान जयंतीच्या दिवशी जेव्हा हिंदुराजा ढोल ताशा पथक विजय रथासमोर सलामी देण्यासाठी आले, तेव्हा त्यांना ढोल वाजवण्यास आणि सलामी देण्यास मनाई करण्यात आली. यामुळे जयंती उत्सव समितीचे सदस्य आणि ढोल ताशा पथकातील कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली, इतकेच नव्हे तर धक्काबुक्की आणि शिवीगाळ झाल्याचे म्हटले आहे. यानंतर जयंती समितीने पोलिसात तक्रार दाखल करून हिंदुत्ववादी युवकांविरोधात गुन्हे नोंदवले. यात एका अल्पवयीन मुलाचा देखील आरोपींमध्ये समावेश करण्यात आला होता. तर दुसऱ्या गटाची फिर्याद घेण्यास पोलिसांनी टाळाटाळ केली होती. त्यामुळे याला प्रत्युत्तर म्हणून हिंदुत्ववादी युवकांनी प्रशासनावरील दबाव वाढवत तब्बल पंधरा दिवसानंतर पोलिसांना समितीच्या पदाधिकाऱ्यांवरही गुन्हे दाखल करण्यास भाग पाडले. यामुळे परिसरातील वातावरण अधिक तणावपूर्ण बनले असून, हा वाद आता आणखी चिघळण्याची शक्यता आहे.
युवकांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, हनुमान जयंती उत्सवाची मोठी ऐतिहासिक परंपरा आहे. परंतु, काही विघ्नसंतोषी लोक या परंपरेत अडथळा आणण्याचा प्रयत्न करत आहेत. हिंदुराजा ढोल ताशा पथक हे स्थानिक युवकांचे असून ते अनेक वर्षांपासून रथाला सलामी देत आले आहेत. असे असतानाही त्यांना नाहक विरोध करणे आणि जयंती उत्सव समितीकडून कार्यक्रमाचे खासगीकरण करण्याच्या उद्देशाने इतरांना विरोध करणे योग्य नाही.
चंद्रशेखर चौकातील हनुमान मंदिर हे संपूर्ण गावाचे श्रद्धास्थान आहे आणि या उत्सवासाठी संपूर्ण गावातून वर्गणी जमा केली जाते. मात्र, काही लोक केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी या उत्सवाला खासगी मालमत्तेप्रमाणे वागवत आहेत. रथावर स्वतःची नावे आणि फोटो लावणे हे अत्यंत निंदनीय आहे. या कृत्यांमुळे काही लोक या रथोत्सवाला आपली खाजगी मालमत्ता म्हणून मिरवत आहेत, ज्याला स्थानिक लोकांचा तीव्र विरोध आहे. त्यामुळे उत्सवाचे हे खासगीकरण कोणत्याही परिस्थितीत स्वीकारले जाणार नाही, असे स्पष्ट मत निवेदनात मांडण्यात आले आहे.
विरोध करणाऱ्या हिंदुत्ववादी युवकांना त्रास देण्यासाठी त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे एका १६ वर्षांच्या मुलाचे नावही गंभीर गुन्ह्यात टाकण्यात आले आहे. काही ‘झारीतील शुक्राचार्य’ त्याचे भविष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोपही निवेदनात करण्यात आला आहे.
या निवेदनावर राहुल शशिकांत नेहूलकर, विनायक पुंडलिक गरुडकर, ललित प्रवीण परदेशी, ललित शरद शिंपी, मयूर विनायक जाधव, शुभम मनोज परदेशी, महेंद्र नंदकिशोर भालारे यांच्यासह अनेक युवकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. या गंभीर आरोपांमुळे संगमनेरातील हनुमान जयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला वाद अधिकच गंभीर बनला असून, यावर भविष्यात काय तोडगा निघतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

“अनेक वर्षांपासून चालत आलेल्या हनुमान विजय रथाच्या मिरवणुकीची एक गौरवशाली परंपरा आहे. अनेक आदरणीय व्यक्तींनी हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला. रथ अनेकदा दुरुस्त केला गेला, सजवला गेला, पण कुणीही त्यावर स्वतःचे नाव टाकण्याचा विचार केला नाही. आता अचानक आलेल्या काही मंडळींना केवळ स्वतःचा स्वार्थ साधायचा आहे म्हणून ते रथावर नावे टाकून या पवित्र उत्सवाचे खासगीकरण करत आहेत. हे अजिबात योग्य नाही. ही संपूर्ण गावाची मिरवणूक आहे. ज्यांना स्वतःचे नाव मिरवायचे आहे, त्यांनी स्वतःची वेगळी मिरवणूक काढावी!” – राहुल नेहुलकर.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,779
पोलीस रथ वाद हनुमान जयंती रथोत्सव
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अश्विनाथ गड हे सामाजिक एकतेचे प्रतीक : माजी मंत्री बाळासाहेब थोरात

27/08/2026

संगमनेरचा ईद ए मिलाद जुलूस शांततेत पार; आयोजक, नागरिक आणि पोलीस प्रशासनाचे कौतुक!

27/08/2026

संगमनेरमध्ये ‘बाजारपेठ व्यापारी मित्र मंडळा’चा ऐतिहासिक निर्णय; यंदा गणपती वर्गणीसाठी वापरणार ‘डिजिटल पावती ॲप’

12/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

एलसीबीची छापेमारी, २.९९ लाखांचा मुद्देमाल जप्त करत १४ आरोपींवर गुन्हा दाखल

By Annant Ppangarkar29/08/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन अहिल्यानगर: अहिल्यानगर जिल्ह्यातील एमआयडीसी, जामखेड आणि बेलवंडी पोलीस ठाण्याच्या…

देशहितासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी..; संगमनेरच्या वकिलाचे जगातील सर्वात उंच पोस्ट ऑफिसमधून थेट पत्र!

29/08/2026

आज शनिवार, २९ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

29/08/2026

अहिल्यानगरमध्ये वकिलाच्या हत्येप्रकरणी ७ आरोपींना मरेपर्यंत जन्मठेप; जिल्हा न्यायालयाचा मोठा निकाल

28/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.