महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर
ज्यांच्या हातात आता राजकारणासाठी कोणतेही मुद्दे शिल्लक राहिलेले नाहीत, तेच लोक आपल्या बगलबच्च्यांना हाताशी धरून शेतकऱ्यांमध्ये हेतुपुरस्सर दिशाभूल करणारे वातावरण तयार करत आहेत आणि त्यांच्यात विष पेरण्याचा प्रयत्न करत आहेत. जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माझी प्रतिमा मलिन करून, हे काही लोक निळवंडे पाण्याच्या आड लपून राजकारण करत आहेत, अशी जोरदार टीका आमदार अमोल खताळ यांनी केली.

संगमनेर तालुक्यात निळवंडेच्या पाण्यावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आमदार खताळ यांच्या कार्यालयाकडून प्रसिद्धी पत्रक माध्यमांना पाठविण्यात आले यात त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, यापूर्वी जानेवारी महिन्यात देखील निळवंडे उजव्या आणि डाव्या कालव्यांना आवर्तन सोडण्यात आले होते. त्यावेळी कोणतीही अडचण न येता सर्वांना पाणी मिळाले होते. मात्र, या वेळी सुद्धा दोन्ही कालव्यांना व्यवस्थित पाणी सुरू होते. हेड ते टेलपर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी जलसंपदा विभागाने योग्य नियोजन केले होते.
उजव्या कालव्याचे पाणी अजून राहुरी तालुक्यामध्ये पोहोचले नसले तरी, कालव्यामध्ये एक-दोन पाईप टाकून पुढे नाले बंधारे भरण्याचे काम सुरू होते. मात्र, काही लोकांनी शेतकऱ्यांना भडकावून देत त्या कालव्यांमध्ये जास्त पाईप टाकून पाण्याच्या मुद्द्यावरच राजकारण सुरू केले आहे, हे अत्यंत दुर्दैवी आहे.
निळवंडे उजवा आणि डावा कालवा लाभक्षेत्रातील प्रत्येक शेतकऱ्याला पाणी मिळालेच पाहिजे, ही माझी पहिल्यापासूनची भूमिका आहे. संगमनेर तालुक्यातील दोन्ही कालव्यांच्या लाभक्षेत्रातील गावातील ओढे, नाले आणि छोटे-मोठे पाझर तलाव भरून देण्याची जबाबदारी माझी आहे, याबाबत जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. गरज पडल्यास जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे पाठपुरावा करून ४ ते ५ दिवसांचे रोटेशन वाढवून प्रत्येकाला पाणी कसे मिळेल यासाठी मी प्रयत्नशील राहील. ज्या शेतकऱ्यांच्या मतांवर मी निवडून आलो आहे, त्यांना मी कधीही वाऱ्यावर सोडणार नाही आणि पाण्यापासून कोणीही वंचित राहणार नाही, असा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला.





निळवंडे उजवा आणि डावा कालवा लाभक्षेत्रातील प्रत्येक शेतकऱ्याला पाणी मिळालेच पाहिजे, ही माझी पहिल्यापासूनची भूमिका आहे. संगमनेर तालुक्यातील दोन्ही कालव्यांच्या लाभक्षेत्रातील गावातील ओढे, नाले आणि छोटे-मोठे पाझर तलाव भरून देण्याची जबाबदारी माझी आहे, याबाबत जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. गरज पडल्यास जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे पाठपुरावा करून ४ ते ५ दिवसांचे रोटेशन वाढवून प्रत्येकाला पाणी कसे मिळेल यासाठी मी प्रयत्नशील राहील. ज्या शेतकऱ्यांच्या मतांवर मी निवडून आलो आहे, त्यांना मी कधीही वाऱ्यावर सोडणार नाही आणि पाण्यापासून कोणीही वंचित राहणार नाही, असा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला.