आपल्या लोकशाही संविधानातील राष्ट्रपतींची देश प्रमुखपदाची गरीमा पूरती तळाला गेली आहे. मोदी सरकारच्या काळात या पदाची अवस्था रबर स्टॅम्पसारखी झाली आहे. अगदी इंदिरा गांधींच्या सरकारपासून चालत आलेली ही परंपरा नरेंद्र मोदींच्या सत्तेने त्याहून खाली आणली आणि देशाच्या प्रमुखाला कणाहीन बनवलं. इतकं की एका मंदिरातला पुजारीही राष्ट्रपतींना ते आदिवासी आणि मागास असल्याच्या कारणास्तव मंदिर प्रवेश नाकारतात. अशा परिस्थितीत सरकारच्या निर्णयांना रोखण्याची हिंमत कोण दाखवेल? राजेंद्र प्रसादांपासून ग्यानी झैलसिंग, के. आर. नारायणन, एपीजे अब्दुल कलाम, प्रणव मुखर्जी अशा काही मोजक्याच राष्ट्रपतींनी केंद्र सरकारला आरसा दाखवला. के. आर. नारायणन यांनी तर गुतरातच्या दंगलीवेळी अटलबिहारींच्या सरकारला खडेबोल सुनावले होते. यानंतर अटलबिहारींनी मोदींना राजधर्म पाळण्याचा मंत्र दिला.
रविवार विशेष लेख — रबर स्टम्पच तो उमटला एकदाचा…!
लेखक दैनिक आपलं महानगरचे माजी निवासी संपादक असून मुंबईतील जेष्ठ पत्रकार व राजकीय विश्लेषकआहेत.




न्यायालयाने दिलेले निर्णय न मानवल्यास राष्ट्रपतींच्या
तामीळनाडूतील भाजपेतर सरकारने पाठवलेल्या
