राजकारणात कसंही वागलं तरी काहींना त्याचं काहीच वाटत नाही. निर्ढावलेले तर मी नाही त्यातली.. अशा प्रकारचा देखावा करतात आणि झालं गेलं, असं मानून चक्क खोटारडेपणा करतात. महाराष्ट्राच्या राजकारणात अशी उपरती झालेले अनेकजण आहेत. ज्यांनी सोबतीच्या साथीदारांना आपलं काम भागल्यानंतर वार्यावर सोडलं आणि पुन्हा तोंड वर करून स्वत:ला निर्दोष असल्याचा स्वत:च निवाडा दिला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही तोच मार्ग अवलंबलेला दिसतो आहे. सत्तेत चढ-उतार दिसू लागले की त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणाचं अवमुल्यन झाल्याची स्वप्न पडतात. हे करायला परिस्थिती भाग पाडते, असं ते बेमालूम कबुलही करतात. सत्ता हवी असली की हातावर हात ठेवून थांबता येत नाही, म्हणून मग अवमुल्यन करावं लागतं असं फडणवीस यांच्या म्हणण्याचा रोख आहे. लोकसभेच्या निवडणुकीत प्रचंड मार बसला तेव्हाही त्यांनी राज्यातल्या राजकारणात झालेल्या अवमुल्यनाची भाषा वापरली होती. आताही तेच ही भाषा वापरत आहेत. राजकारणात कोणी धुतल्या तांदळाप्रमाणे प्रामाणिक नाही. कोणी कुठल्या पक्षात कधी जावं याला काही बंधनं नाहीत. मात्र नैतिकता म्हणून आहोत त्या पक्षाशी आणि त्या पक्षाच्या नेत्याशी प्रामाणिक राहावं, इतकी माफक अपेक्षा असते. यातही अवमुल्यन आलंच. मात्र ते काही मर्यादा ठेवून. स्वार्थासाठी अनैतिक मार्ग ज्या नेत्यांनी अवलंबला त्यात फडणवीस यांचं घ्यावंच लागेल. चेहरा प्रामाणिक असून चालत नाही. या चेहर्यामागे घडणार्या घटना नैतिक असतीलच असं नाही.
रविवार विशेष लेख… राजकीय अवमुल्यनाचे मानकरी
लेखक दैनिक आपलं महानगरचे माजी निवासी संपादक असून मुंबईतील जेष्ठ पत्रकार व राजकीय विश्लेषकआहेत.




राजकारणात एकमेकांना दोष देणं, टीका करणं या
मुख्यमंत्रीपदी बसलेली फडणवीसांसारखी व्यक्ती
