Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आंदोलकांचा आवाज दाबणे ही हुकूमशाहीची नांदी; प्रकाश आंबेडकर यांची केंद्र सरकारवर तीव्र टीका

July 20, 2026

आज, सोमवार २० जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 20, 2026

घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयातील ढिसाळ कारभारावर शिवसेना शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी आक्रमक; आंदोलनाचा इशारा

July 19, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » निळवंडेच्या पाण्याने चिंचोली गुरवला जलसमृद्धी – इंद्रजीत थोरात
राजकारण

निळवंडेच्या पाण्याने चिंचोली गुरवला जलसमृद्धी – इंद्रजीत थोरात

बाळासाहेब थोरात यांनी प्रत्येक शेतकऱ्याला पाणी मिळावे यासाठी नियोजन केले होते, मात्र सत्ता बदलामुळे कामात काही अडथळे आले.
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरJune 5, 2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी 

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नांमुळे निळवंडे धरणाचे पाणी अहमदनगर जिल्ह्यातील 182 गावांसह, विशेषतः तळेगाव गटातील दुष्काळग्रस्त गावांमध्ये पोहोचले आहे. त्यांच्या पूर्णत्वास गेलेले धरण आणि उजवा व डावा कालवा शेतकऱ्यांच्या शेतात पाणी घेऊन आल्याने परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे, असे प्रतिपादन सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात यांनी केले.

चिंचोली गुरव येथे निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यातून विविध बंधारे भरताना आयोजित पाणीपूजन प्रसंगी थोरात बोलत होते.

थोरात पुढे म्हणाले की, निळवंडेच्या कालव्यांमधून पाणी आल्याने संगमनेर तालुक्यात जलसमृद्धी निर्माण झाली आहे. थोरात कारखान्याच्या माध्यमातून विविध गावांमध्ये यंत्रसामग्री पुरवून चारी खोदून बंधारे भरून देण्यात आले आहेत, तर अनेक ठिकाणी पाईप वापरून पाणी उचलण्यात आले आहे. बाळासाहेब थोरात यांनी प्रत्येक शेतकऱ्याला पाणी मिळावे यासाठी नियोजन केले होते, मात्र सत्ता बदलामुळे कामात काही अडथळे आले.

असे असले तरी, ते सर्वांना पाणी मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करत आहेत आणि राज्यातील मंत्र्यांशी त्यांचे असलेले चांगले संबंध विकासकामांमध्ये कोणतीही अडचण येऊ देणार नाहीत. ज्या शेतकऱ्यांना अद्याप पाणी मिळाले नाही, त्यांच्यासाठी आराखडा तयार करण्यात आला असून लवकरच काम सुरू होईल, असेही त्यांनी नमूद केले.

यावेळी संपतराव गोडगे यांनी चिंचोली गुरवमध्ये निळवंडे धरणाचे पाणी आल्याने शेतकरी व नागरिक आनंदी झाले असल्याचे सांगितले. कारखान्याने जेसीबी, पोकलॅण्डसह कर्मचारी रात्रंदिवस काम करून मसोबाच्या बंधाऱ्यांमध्ये पाणी पोहोचवल्याबद्दल त्यांनी आभार मानले.

सरपंच विलास सोनवणे यांनी बाळासाहेब थोरात यांनी अशक्य वाटणारे काम शक्य करून दाखवले असून, काम करणाऱ्या व्यक्तीच्या पाठीशी कायम उभे राहायला हवे असे आवाहन केले. अविनाश सोनवणे यांनी काही लोक सोशल मीडियावर खोटी माहिती पसरवून दिशाभूल करत असल्याबद्दल चिंता व्यक्त करत, त्यांना वेळीच रोखण्याचे आवाहन केले.

या कार्यक्रमाला संपतराव गोडगे, हौशीराम सोनवणे, अविनाश सोनवणे, सरपंच विलास अण्णा सोनवणे, बाबा ओहोळ, प्रभाकर कांदळकर, नामदेव दादा दिघे, अनिल कांदळकर, राजू गोडगे, विजय गोडगे, सतीश सोनवणे, डॉ. सुहास आभाळे, विनोद गोडगे, सचिन दिघे, योगेश सोनवणे, संदेश गोडगे, अशोक गोडगे, के. डी. सोनवणे, अरुण आभाळे, सोमनाथ आभाळे, भास्कर पानसरे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हौशीराम सोनवणे यांनी केले, तर सूत्रसंचालन विलास मास्तर सोनवणे यांनी केले.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 495
कालवे निळवंडे पाणी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

राम मंदिरातील लूटमारीनंतर भाजपच्या राज्यात शैक्षणिक घोटाळा… नसलेल्या महाविद्यालयातून हजारो विद्यार्थ्यांना पदव्या

July 14, 2026

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या संगमनेर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर; अमर कतारी यांच्याकडे तालुकाप्रमुखपदाची धुरा, नव्या पदाधिकाऱ्यांमध्ये यांचा समावेश

July 14, 2026

‘दुर्गाताई, आता आत्मपरीक्षणाची गरज; लाभार्थ्यांना बाजूला करा!, ताईंवर चिखलफेक होत असताना काँग्रेसचे २८ नगरसेवक गप्प का? – शिवसेनेचे अमर कतारी यांचा महाविकास आघाडीला घरचा आहेर

July 11, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
आंदोलन

आंदोलकांचा आवाज दाबणे ही हुकूमशाहीची नांदी; प्रकाश आंबेडकर यांची केंद्र सरकारवर तीव्र टीका

By अनंत पांगारकरJuly 20, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन मुंबई: दिल्लीतील जंतर-मंतर येथे शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जच्या…

आज, सोमवार २० जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 20, 2026

घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयातील ढिसाळ कारभारावर शिवसेना शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी आक्रमक; आंदोलनाचा इशारा

July 19, 2026

अतिक्रमणाच्या नावाखाली संगमनेरात गरिबांवर बुलडोझर, धनदांडग्यांवर मेहेरनजर; ‘सिंघम’ बनलेल्या प्रशासनाविरोधात नागरिकांचा संतप्त सवाल

July 19, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.