
संगमनेर, प्रतिनिधी – सर्वोच्च न्यायालयाने जामीन अर्ज मंजूर केल्यानंतर पुन्हा गुन्हा केल्याने आरोपीला अटक करून ताब्यात घेण्याचे आदेश मिळण्याबाबत केलेल्या अर्जावर सुनावणी होऊन न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे.
आंबी खालसा (संगमनेर) येथील अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याचा, धर्मांतर घडवून आणल्याचा व अत्याचार केल्याचा गंभीर आरोप असलेल्या लव्ह जिहाद प्रकरणातील मुख्य सहआरोपी युसुफ चौघुले यास यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला होता. मात्र, यानंतर त्याला मध्यप्रदेशमध्ये ६ गावठी कट्टे व ४ जिवंत काडतुसांसह पकडून अटक करण्यात आली आहे. त्यामुळे त्याच्यावर पुन्हा गंभीर स्वरूपाचे आरोप वाढले होते.

दरम्यान घारगाव पोलीस स्टेशन मार्फत सरकार पक्षातर्फे संगमनेर येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्यासमोर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 483(3) अन्वये क्रिमिनल चौकशी अर्ज नंबर 18/2025 दाखल करण्यात आला होता. सदरचा अर्ज माननीय जिल्हा न्यायालयाने दिनांक 19 जून रोजी मंजूर केला आहे. खासगी वकील के. डी. धुमाळ यांनी विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्यावतीने प्रभावीपणे बाजू मांडली. या निर्णयामुळे संबंधित घटनेबाबत न्याय मिळत असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.
याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असून, अशा घटनांवर कठोर कारवाई होणे गरजेचे असल्याचा सूर जनतेतून उमटत आहे.

लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपी युसुफ चौघुले संदर्भात जिल्हा न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असून, अशा घटनांवर कठोर कारवाई होणे गरजेचे असल्याचा सूर जनतेतून उमटत आहे.

