चंदनापुरी घाटात स्कूल बस पलटी, विद्यार्थी जखमी; वाहतूक व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
जखमी विद्यार्थ्यांची प्रकृती सध्या स्थिर असून त्यांना किरकोळ दुखापती झाल्या आहेत. अपघाताची माहिती मिळताच पालकांनीही रुग्णालयात धाव घेऊन आपल्या पाल्यांना आधार दिला.

संगमनेर, ४ जुलै- प्रतिनिधी: 
या घटनेमुळे शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या स्कूल बसेसच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. ग्रामीण भागातून विद्यार्थ्यांना शहरांमधील शाळांमध्ये आणण्यासाठी अनेक शाळा प्रयत्नशील असतात, मात्र या स्कूल बसेस शासनाने घालून दिलेल्या नियमांचे आणि अटींचे पालन करतात का, याबाबत अनेकदा शंका उपस्थित होते.

