संगमनेर, प्रतिनिधी:
भंडारदरा पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे निळवंडे धरणातून प्रवरा नदीपात्रात सोमवारी दुपारी १०,००० क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे जलसंपदा विभागाने नदीकाठच्या सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. आमदार अमोल खताळ यांनी देखील नागरिकांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
भंडारदरा धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी निळवंड्यात येत असल्याने, धरणाचा विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर, संगमनेर तालुक्यातील प्रवरा नदीकाठच्या सांगवी, धांदरफळ, मंगळापूर, खांडगाव, कासारा दुमाला, संगमनेर खुर्द, निंबाळे, रायते, वाघापूर, खराडी, पिंपरणे, जोर्वे, रहिमपूर, कनोली आणि ओझर बंधारा परिसरातील नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी.
आमदार खताळ यांनी आवाहन केले आहे की, नदीपात्रात असलेले जनावरे, पाण्याचे पंप, शेती साहित्य, ट्रॅक्टर आणि इतर अवजारे तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलवावीत. तसेच, नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह असल्याने कोणीही आंघोळीसाठी किंवा पोहण्यासाठी नदीत जाऊ नये. नागरिकांनी आपली आणि आपल्या मालमत्तेची सुरक्षितता सुनिश्चित करावी.
सावधान! निळवंडे धरणातून प्रवरा नदीत १०,००० क्युसेकने पाणी सोडले; नदीकाठच्या नागरिकांनी काळजी घेण्याचे आमदार खताळ यांचे आवाहन
भंडारदरा धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी निळवंड्यात येत असल्याने, धरणाचा विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढवण्यात येत आहे.



भंडारदरा धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी
आमदार खताळ यांनी आवाहन केले आहे की,
