

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन
मुंबई, विशेष प्रतिनिधी:
विधानसभेचे अधिवेशन संपल्यानंतर राज्य शासनाने प्रशासकीय पातळीवर मोठे बदल केले आहेत. यात पाच अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांची जालना जिल्हाधिकारीपदी बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी ओंकार पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर तुकाराम मुंढे यांची वीस वर्षाच्या कार्यकाळात 23व्यांदा बदली करण्यात आली आहे.
बदली झालेल्या अधिकाऱ्यांची नावे आणि त्यांच्या नवीन नियुक्त्या:
तुकाराम मुंडे – सचिव, दिव्यांग कल्याण विभाग, मुंबई.
नितीन काशीनाथ पाटील – विशेष आयुक्त, राज्य कर, महाराष्ट्र, मुंबई.
अभय महाजन – व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघ, मुंबई.
ओंकार पवार – मुख्य कार्यकारी अधिकारी, नाशिक जिल्हा परिषद.
आशा अफझल खान पठाण – महासंचालक, वनमती, नागपूर, अतिरिक्त कार्यभार, सहसचिव, मुख्यमंत्री सचिवालय, नागपूर.





बदली झालेल्या अधिकाऱ्यांची नावे आणि त्यांच्या नवीन नियुक्त्या: