Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

महायुती सरकारचा मोठा निर्णय: भोजापूर पूरचारीचा नदीजोड प्रकल्पात समावेश; संगमनेर, सिन्नर तालुक्यातील दुष्काळी ३५ गावांना दिलासा!

01/09/2026

आज मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

01/09/2026

आज सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

31/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » २५ कोटी रुपयांच्या विकास कामांचे नियोजन: संगमनेरमध्ये विखे पाटील यांच्या पुढाकाराने दुष्काळी भागाला मिळणार पाणी- डॉ. सुजय विखे
पाण्याचे राजकारण

२५ कोटी रुपयांच्या विकास कामांचे नियोजन: संगमनेरमध्ये विखे पाटील यांच्या पुढाकाराने दुष्काळी भागाला मिळणार पाणी- डॉ. सुजय विखे

महायुतीच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुका जल स्वावलंबनाच्या दिशेने वाटचाल करत आहे
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar06/08/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन

संगमनेर, प्रतिनिधी: दुष्काळग्रस्त भागाला सुजलाम सुफलाम करण्यासाठी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुजय विखे पाटील यांनी २५ कोटी रुपयांच्या विकास कामांचे नियोजन जाहीर केले आहे. मागील १८ वर्षांत केवळ ५ कोटी रुपये खर्च झाल्याचा उल्लेख करत, त्यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांच्या नेतृत्वाखाली पुढील अडीच वर्षांत या कामांना गती देण्याची ग्वाही दिली.

भोजापूर चारीच्या जलपूजन सोहळ्यात नान्नज दुमाला येथे डॉ. सुजय विखे पाटील यांनी हे प्रतिपादन केले. या कार्यक्रमाला आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी नीलम, माजी तालुकाध्यक्ष भीमराव चतर, शिवसेना नेते विठ्ठलराव घोरपडे, संदीप देशमुख यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी बोलताना डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले की, ४० वर्षे सत्तेत राहूनही पाणी न आणणाऱ्यांना जनतेने बाजूला केले आणि महायुतीवर विश्वास दाखवला. आज आम्ही त्या विश्वासाला पात्र ठरत आहोत. मी यापूर्वी शब्द दिला होता की ज्या दिवशी पाणी पोहोचेल, त्याच दिवशी मी इथे सभा घेईन, आणि आज तो दिवस आहे. ही केवळ सभा नाही, तर जनतेच्या आश्वासनपूर्तीची साक्ष आहे.

हे सत्तांतर केवळ विकासाचे प्रतीक नसून, जनतेच्या अपेक्षांना मिळालेले ठोस उत्तर आहे. महायुतीच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुका जल स्वावलंबनाच्या दिशेने वाटचाल करत आहे, असे सांगत सक्षम नेतृत्वामुळेच खरा विकास घडतो.

आमदार खताळ यांच्या पाठपुराव्यामुळे आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून हा भाग जलसमृद्ध होत असल्याचा अभिमानही त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमात बोलताना नीलम खताळ यांनी महिलांना पाण्यासाठी वर्षानुवर्षे सोसाव्या लागलेल्या हालअपेष्टांना आता न्याय मिळाल्याचे सांगितले. तसेच, ज्येष्ठ नेते भीमराव चतर यांनी विरोधकांवर टीका करत कै. बाळासाहेब विखे पाटील यांच्या कार्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्यांनी ४० वर्षांत काय केले, असा सवाल उपस्थित केला.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 557
पाणी सुजय विखे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

महायुती सरकारचा मोठा निर्णय: भोजापूर पूरचारीचा नदीजोड प्रकल्पात समावेश; संगमनेर, सिन्नर तालुक्यातील दुष्काळी ३५ गावांना दिलासा!

01/09/2026

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीच्या बेकायदा घरावर बुलडोझर; अहिल्यानगर जिल्ह्यातील पहिलीच धडक कारवाई

18/06/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
पाण्याचे राजकारण

महायुती सरकारचा मोठा निर्णय: भोजापूर पूरचारीचा नदीजोड प्रकल्पात समावेश; संगमनेर, सिन्नर तालुक्यातील दुष्काळी ३५ गावांना दिलासा!

By Annant Ppangarkar01/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुक्यातील भोजापूर प्रकल्पाच्या पूरचारीचा समावेश दमणगंगा–वैतरणा-गोदावरी नदीजोड प्रकल्पात…

आज मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

01/09/2026

आज सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

31/08/2026

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.