महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन
मुंबई, विशेष प्रतिनिधी:
मराठा आरक्षणासाठी आग्रही असलेले आणि मराठा समाजाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. जरांगे यांनी येत्या २९ ऑगस्टपासून मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करण्याची घोषणा केली होती, परंतु आता मुंबई उच्च न्यायालयाने त्यांच्या या आंदोलनाला परवानगी नाकारली आहे.
जरांगे यांच्या आंदोलनाला विरोध करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. याच याचिकेवर आज मंगळवारी (२६ ऑगस्ट) सुनावणी झाली, यानंतर न्यायालयाने जरांगे यांच्या आंदोलनाला परवानगी नाकारली. विशेष म्हणजे, गणेशोत्सवामुळे मुंबईतील वाहतूक विस्कळीत होऊ नये म्हणून न्यायालयाने हा निर्णय घेतला आहे. न्यायालयाने असेही स्पष्ट केले की, जरांगे यांना निदर्शने करण्यासाठी खारघर किंवा नवी मुंबईसारखी पर्यायी जागा उपलब्ध करून देणे सरकारसाठी खुले आहे.
न्यायालयाने परवानगी नाकारल्यानंतरही मनोज जरांगे पाटील त्यांच्या ‘चलो मुंबई’ आंदोलनावर ठाम आहेत. गणेश चतुर्थीच्या दिवशी म्हणजे २७ ऑगस्टला ते अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने निघणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. “आझाद मैदानात परवानगीला काय प्रॉब्लेम आहे? आमचा न्यायदेवतेवर पूर्ण विश्वास आहे. मुंबई उच्च न्यायालय १०० टक्के परवानगी देईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
जरांगे यांनी सरकारच्या या भूमिकेवर नाराजी व्यक्त करत सरकार जर अशीच अडवणूक करत असेल, तर लोकशाही बदलावी लागेल, असा इशाराही दिला. ते म्हणाले, आम्ही कायदा आणि संविधानाचे सगळे नियम पाळून आंदोलन करू. आमचे वकील न्यायालयात जातील आणि न्यायदेवता आम्हाला न्याय देईल. सरकारने आमच्यासोबत षडयंत्र रचल्याचा आरोपही त्यांनी केला.
यामुळे, मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी नाकारली असली तरी मनोज जरांगे पाटील त्यांच्या आंदोलनावर ठाम आहेत. आता त्यांचे वकील न्यायालयात काय भूमिका घेतात आणि यावर न्यायालय काय निर्णय देते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला मुंबई उच्च न्यायालयाचा ‘रोख’, परवानगीशिवाय सत्याग्रह, निदर्शनं, उपोषण नाही
मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी नाकारली असली तरी मनोज जरांगे पाटील त्यांच्या आंदोलनावर ठाम आहेत.





जरांगे यांनी सरकारच्या या भूमिकेवर नाराजी व्यक्त करत
