महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन
संगमनेर, प्रतिनिधी: नागरिकांच्या आरोग्याशी थेट संबंध असलेल्या गुळातील भेसळीवर अन्न व औषध प्रशासन (FDA) कोणतीही कारवाई करत नसल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते शंकर रावसाहेब ढमाले यांनी गुरुवारपासून (२८ ऑगस्ट) संगमनेर येथील प्रांत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. गुळात भेसळ करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या आणि भेसळखोरांना क्लीनचीट देणाऱ्या अहिल्यानगरच्या अन्न व औषध प्रशासनाविरोधात हे उपोषण आहे.
ढमाले यांनी ‘महाराष्ट्र संवाद न्यूज’शी बोलताना सांगितले की, शहरातील सिद्धी गुळ नैसर्गिक गुळ या नावाने विकला जाणारा गुळ खरेदी केल्यानंतर या गुळामुळे त्यांना आजारपणाचा सामना करावा लागला आणि त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. या गुळात भेसळ असल्याचा संशय आल्याने त्यांनी खासगी लॅबमध्ये गुळाची तपासणी केली. त्या तपासणीत गुळात भेसळ असल्याचा अहवाल आला. त्यानंतर त्यांनी अहिल्यानगर येथील FDA विभागाकडे तक्रार दाखल केली. मात्र, FDA ने या प्रकरणी कोणतीही कारवाई केली नाही.
माहिती अधिकारांतर्गत कारवाईची माहिती मागितल्यावर ती दोन वेळा नाकारण्यात आली. त्यानंतर त्यांनी नाशिक येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे अपील केले. FDA अधिकारी या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचे लक्षात आल्याने ढमाले यांनी उपोषणाचा निर्णय घेतला.
भेसळखोरांना पाठीशी घालण्याचा आरोप- ढमाले यांनी आरोप केला आहे की, संगमनेर शहरात आणि तालुक्यात गुळातील भेसळीसोबतच आणखी सात ते आठ भेसळीची प्रकरणे आहेत, ज्यांच्याबद्दल FDA कडे तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. तरीही या विभागाकडून कोणतीही कारवाई केली जात नाही.
अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी भेसळयुक्त उत्पादकांच्या मालकांना पाठीशी घालत आहेत. यात काहीतरी काळेबेरे असल्याची शक्यता आहे, असा गंभीर आरोप ढमाले यांनी केला.
या प्रकारामुळे प्रशासनाकडून आपल्याला न्याय मिळणार नाही असे वाटल्याने अखेरीस ढमाले यांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे. आता भेसळखोरांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर प्रशासनाकडून काय पावले उचलली जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अहिल्यानगरच्या FDA विरोधात सामाजिक कार्यकर्त्याचे संगमनेरमध्ये आमरण उपोषण: नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या भेसळखोरांवर कारवाईची मागणी
नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या आणि भेसळखोरांना क्लीनचीट देणाऱ्या अहिल्यानगरच्या अन्न व औषध प्रशासनाविरोधात हे उपोषण आहे.



महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन

माहिती अधिकारांतर्गत कारवाईची माहिती मागितल्यावर

या प्रकारामुळे प्रशासनाकडून आपल्याला न्याय मिळणार नाही