Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

घारगावमध्ये केमिकलयुक्त ताडीच्या अड्ड्यावर राज्य उत्पादन शुल्कचा छापा; २२० लिटर ताडी नष्ट!

July 15, 2026

युरियाचा बफर स्टॉक तातडीने खुला करा, अन्यथा तीव्र आंदोलन; संगमनेर तालुका काँग्रेसचा प्रशासनाला इशारा

July 15, 2026

आज, बुधवार १५ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 15, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » आमदार खताळ यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ संगमनेरमध्ये मूक मोर्चा, पालकमंत्री राधाकृष्ण विखे, आमदार विठ्ठलराव लंघे यांनी केला निषेध
आंदोलन

आमदार खताळ यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ संगमनेरमध्ये मूक मोर्चा, पालकमंत्री राधाकृष्ण विखे, आमदार विठ्ठलराव लंघे यांनी केला निषेध

मोर्चात पालकमंत्री विखे पाटील यांच्यासह आमदार विठ्ठलराव लंघे आणि महायुतीचे पदाधिकारी-कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरAugust 29, 2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर – 

एका हल्ल्याने तालुक्याचा आमदार बदलला आता संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा खरा निषेध करायचा असेल, तर येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुकीतही भगवा फडकला पाहिजे, असे म्हणत कार्यकर्त्यांना आवाहन करत आपणही मेलेल्या आईचे दूध प्यायलेलो नाही, खताळ यांच्यावर झालेली घटना अचानक घडलेली नाही. याचा सूत्रधार पोलिसांनी शोधावा. तसेच याप्रकरणी दुर्लक्ष करणाऱ्या पोलिसांवर देखील कारवाई करण्यात येईल, असा इशारा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला.

आमदार अमोल खताळ यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ महायुतीने आज, शुक्रवारी प्रांत अधिकारी कार्यालयावर मूकमोर्चा काढला. मोर्चात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. यावेळी बोलताना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली.

विखे म्हणाले, तालुका दहशतीखाली ठेवण्यासाठी विरोधकांचा कार्यक्रम करायचा हा प्रकार अनेक वर्षे संगमनेर तालुक्यात झालेला आहे. पराभवाचे दुःख त्यांना अजूनही पचवता येत नाही. लोकशाही मान्य नसल्याने ते आता ठोकशाहीवर आले आहेत. त्यांच्या या प्रवृत्तीमुळेच लोकांनी त्यांना घरी बसवले. तसेच वेळ आली तर जशास तसे उत्तर देण्याची आपलीही तयारी आहे, अशा शब्दांत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी हल्ला चढवला.

कीर्तनकारापाठोपाठ आमदारावर हल्ला करण्याचा प्रकार संगमनेर तालुक्यात घडला. याच दहशतीच्या विरोधात आमदार खताळ उभे आहेत. तालुक्याच्या विकासाचा मार्ग त्यांनी खुला करून दिला आहे. त्यांनी वर्षानुवर्ष तालुक्याला पाण्यापासून वंचित ठेवले, मात्र, आपण विधानसभा निवडणुकीत दिलेल्या आश्वासनानुसार तालुक्याच्या सर्व भागात पाणी फिरवून तालुका दुष्काळमुक्त केला. हेच त्यांना पाहवत नसल्याने त्यांचे खरे रूप कालच्या घटनेतून तालुक्याला कळले आहे.

आमदार खताळ म्हणाले, कोणाच्या तरी हस्तकाने आपल्यावर हा भ्याड हल्ला केला आहे. या हल्ल्याने आपण खचणार नाही अथवा विचलितही होणार नाही. सध्या उत्सवाचे दिवस सुरू असल्याने कार्यकर्त्यांनी उद्रेक न करता शांतता ठेवावी. पोलीस योग्य तपास करून सत्य सर्वांसमोर आणतील. आमदार लंघे यांनीही या घटनेचा निषेध केला. श्रीराम गणपुले, अविनाश थोरात, आप्पा केसेकर, शौकत जहागीरदार आदींची यावेळी निषेधपर भाषणे झाली.

मोर्चात पालकमंत्री विखे पाटील यांच्यासह आमदार विठ्ठलराव लंघे आणि महायुतीचे पदाधिकारी-कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सध्या शहरात तणावपूर्ण शांतता असून, अतिरिक्त पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 1,117
अमोल खताळ मूक मोर्चा राधाकृष्ण विखे हल्ला
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

संगमनेर पाणीपुरवठा निविदा गैरव्यवहार: अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय चौकशी, दोन महिन्यांत कारवाईची राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची घोषणा

July 8, 2026

संगमनेरमध्ये भव्य कामगार रुग्णालय लवकरच सेवेत; आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश

July 8, 2026

संगमनेरकरांच्या हक्काची रेल्वे शिर्डीकडे पळवली; डॉ. जयश्रीताई थोरात यांचा महायुती सरकारवर गंभीर आरोप, संगमनेरकरांनी आता रस्त्यावर उतरावे!

June 30, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

घारगावमध्ये केमिकलयुक्त ताडीच्या अड्ड्यावर राज्य उत्पादन शुल्कचा छापा; २२० लिटर ताडी नष्ट!

By अनंत पांगारकरJuly 15, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर : संगमनेर तालुक्यातील पठार भागातील घारगाव येथे गेल्या अनेक वर्षांपासून…

युरियाचा बफर स्टॉक तातडीने खुला करा, अन्यथा तीव्र आंदोलन; संगमनेर तालुका काँग्रेसचा प्रशासनाला इशारा

July 15, 2026

आज, बुधवार १५ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 15, 2026

राम मंदिरातील लूटमारीनंतर भाजपच्या राज्यात शैक्षणिक घोटाळा… नसलेल्या महाविद्यालयातून हजारो विद्यार्थ्यांना पदव्या

July 14, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.