संगमनेर –
पैगंबर मोहम्मद यांच्या १५०० व्या पवित्र पर्वाचे औचित्य साधून संगमनेर शहरात ‘ईद-ए-मिलादुन्नबी’ निमित्त ‘सर्वधर्म समभाव’ जपणाऱ्या संस्था आणि व्यक्तींचा विशेष सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. ह्युमन इनोवेशन ऑर्गनायझेशन, सर्वांसाठी मानवाधिकार आणि ‘न्यूज एनएमपी मराठी’ वृत्तवाहिनीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यात विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या सोहळ्यात पैगंबर मोहम्मद यांच्या शिकवणीनुसार समाजात चांगले कार्य करणाऱ्या संस्थांना त्यांच्या योगदानाबद्दल ‘सन्मानचिन्ह’ आणि ‘कृतज्ञता सन्मानपत्र’ देऊन गौरवण्यात आले. यात एनआरसीसी ग्रुप मंत्री फाउंडेशन, एकता नगर सोशल फाउंडेशन, ह्युमन रिलिफ अल्पसंख्याक फाउंडेशन, मोगलपुरा मस्जिद ट्रस्ट, गवंडीपुरा मस्जिद ट्रस्ट याचबरोबर, सामाजिक कार्यकर्ते प्रवीण नारायणे (शिवकला पोहे सेंटर) आणि एस.डी.पी.आय ग्रुप यांनाही विशेष सन्मानित करण्यात आले. सर्व सन्मानितांना मराठी भाषेत पवित्र कुराण, कुराण आणि विज्ञान, तसेच संत-महात्म्यांची पुस्तके भेट देण्यात आली, यामुळे धार्मिक एकतेचा संदेश अधिक दृढ झाला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान अँग्लो उर्दू हायस्कूलचे चेअरमन गणी हाजी शेख यांनी भूषवले, तर संगमनेर शहर पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रमुख पाहुण्यांमध्ये ह्युमन इनोवेशन ऑर्गनायझेशनचे संस्थापक अध्यक्ष गुड्डूभाई सैय्यद, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रफिकभाई सैय्यद, महिला उत्तर महाराष्ट्र अध्यक्षा मनीषाताई पवार, सामाजिक कार्यकर्त्या तेजश्री बडगुजर आणि लोखंडे मॅडम, नाशिक पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष अकील पटेल, प्रा. शमशुद्दीन ईनामदार आणि माजी नगरसेवक नुरमहंमद यांचा समावेश होता.
या कार्यक्रमाला संगमनेरसह जिल्ह्यातील विविध क्षेत्रांतील अनेक प्रतिनिधींनी हजेरी लावली. यात इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडिया पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष अस्लम बिनसाद, आरोग्य मित्र शाहनवाज शहा, ईनायमत सय्यद, अझहर भाई शेख (कोपरगाव), अफसर तांबोळी, मुजाहिद पठाण, काँग्रेस कमिटीचे संगमनेर शहर अल्पसंख्याक अध्यक्ष जावेद शेख, जुबेर निसार खान, ठाकरे गटाचे शिवसेना कार्यकर्ते इम्तियाज शेख, फैसल सय्यद आणि सहसंपादक वसीम सय्यद (घारगाव), शिवसेना शिंदे गटाचे मजहर शेख, गुड्डू इंजिनियर, कुरेशी जमात अध्यक्ष नदिम कुरैशी आणि अफताब उर्फ पिंटूशेठ नाईकवाडी यांचा समावेश होता.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार शौकत पठाण यांनी केले, तर आभार प्रदर्शन अजीजभाई ओहरा यांनी केले. हा सोहळा केवळ सन्मानापुरता मर्यादित नसून, तो धार्मिक सलोखा आणि सामाजिक बांधिलकीचे प्रतीक बनला, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आल्याची माहिती ह्युमन इनोवेशन ऑर्गनायझेशनच्या महिला जिल्हाध्यक्षा बानोबी पठाण (शेख) आणि महासचिव तथा सहसंपादक जमीर शेख (बब्बू पाकीजा) यांनी दिली आहे.
संगमनेरमध्ये ‘ईद-ए-मिलादुन्नबी’ निमित्त ‘सर्वधर्म समभाव’ जपणाऱ्यांचा गौरव
सोहळ्यात पैगंबर मोहम्मद यांच्या शिकवणीनुसार समाजात चांगले कार्य करणाऱ्या संस्थांना त्यांच्या योगदानाबद्दल 'सन्मानचिन्ह' आणि 'कृतज्ञता सन्मानपत्र' देऊन गौरवण्यात आले.



संगमनेर – 
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान
