संगमनेर –
संत तुकाराम महाराजांच्या वचनाप्रमाणे सध्याच्या परिस्थितीत खराखोटा निवाडा करण्यासाठी वारकरी संत विचारावर चिंतन होण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे या पार्श्वभूमीवर भागवत वारकरी चिंतन परिषदेचे संगमनेरमध्ये आयोजन करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
रविवारी (१४ सप्टेंबर) सकाळी १० वाजता रंगारगल्लीतील विठ्ठल मंदिर ऑफ नामदेव शिंपी समाजाच्या जनसखा समाज भवनामध्ये आयोजित या चिंतन परिषदेचे उद्घाटन जेष्ठ कीर्तनकार ह. भ. प. ज्ञानेश्वर महाराज वाबळे यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी पंढरपूरच्या संत कैकाडी महाराजांचे उत्तर अधिकारी ह. भ. प. भारत जाधव महाराज असतील.
सकाळी १० ते ४ वाजेपर्यंत चालणाऱ्या या कार्यक्रमात सकाळी ११ वाजता वारकरी संप्रदाय काल आज आणि उद्या या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे या परिसंवादामध्ये आळंदीच्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील ह. भ. प. राजाभाऊ चोपदार व संगमनेर मधील जेष्ठ कीर्तनकार ह. भ. प. व्यंकटेश महाराज सोनवणे सहभागी होतील.
तर समारोपाच्या सत्रात ज्येष्ठ पत्रकार, ह. भ. प. सचिन परब, संत साहित्याचे अभ्यासक ह. भ. प. डॉ. बालाजी महाराज जाधव आणि पत्रकार, ह. भ. प. श्यामसुंदर सोन्नर महाराज मार्गदर्शन करणार आहे. आभार पसायदान पंढरपूरचे ह. भ. प. समाधान महाराज देशमुख करणार आहे.
या परिषदेच्या माध्यमातून भागवत धर्माचा विचार आणि वारकरी संप्रदायाची थोरवी लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला असून वारकरी संप्रदायाच्या विचारांवर निष्ठा प्रेम असणाऱ्या वारकऱ्यांनी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजक संगमनेर तालुका वारकरी संप्रदाय संघटनेचे अध्यक्ष ह. भ. प. सुदाम महाराज कोकणे, सचिव ह. भ. प. बाळकृष्ण महाराज कर्पे, संविधान समता दिंडीचे संयोजक ह. भ. प. भारत महाराज घोगरे, साथी भास्करराव दुर्वे नाना पतसंस्थेचे चेअरमन सिताराम राऊत आणि विठ्ठल मंदिर ऑफ नामदेव शिंपी समाजाचे अध्यक्ष, पंढरपूरच्या संत विचारपिठाचे विश्वस्त राजा अवसक यांनी केले आहे.
संगमनेरमध्ये उद्या (रविवारी) वारकरी चिंतन परिषद
वारकरी संप्रदाय काल आज आणि उद्या या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे



संगमनेर –
तर समारोपाच्या सत्रात
