संगमनेर –
माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या ‘यशोधन’ कार्यालयाने संगमनेर तालुक्यातील सुमारे १२ हजार असंघटित कामगारांना सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या कामामध्ये मदत पोहोचवण्याचं श्रेय घेणाऱ्या इतर लोकप्रतिनिधींवर असंघटित कामगारांचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर मुंगसे यांनी टीका केली आहे.
मुंगसे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटल्यानुसार, सन २०२२-२३ पासून थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आणि इंद्रजीत थोरात व डॉ. जयश्री थोरात यांच्या नेतृत्वाखाली ‘यशोधन’ कार्यालयाने गावागावात जाऊन गरजू कामगारांना मदत केली. ज्यांना सरकारी योजनांची माहिती नव्हती, त्यांना घरी जाऊन माहिती दिली, फॉर्म भरण्यासाठी मदत केली आणि त्यांना शिष्यवृत्ती, आजारपणात मदत व इतर लाभ मिळवून दिले. यशोधन कार्यालयात दररोज सहा कर्मचारी या कामगारांच्या मदतीसाठी कार्यरत असतात.
मुंगसे यांनी लोकप्रतिनिधींवर नाव न घेता टीका केली. ते म्हणाले, जे काम करत नाहीत ते केवळ फोटो काढून श्रेय घेतात, त्यांनी असे करणे थांबवावे. गोरगरिबांच्या नावावर राजकारण करू नका. तुम्ही फॉर्म भरले नाहीत, तर तुमचे फोटो कसे छापले जातात?
आम्ही गरीब असलो तरी स्वाभिमानी आहोत. ज्यांनी काम केले, त्यांनाच आम्ही श्रेय देतो. गरीब लोक मदतीसाठी यशोधन कार्यालयातच जातात, कारण त्यांना तिथे सेवा मिळते. त्यांच्या मते, १२ हजार कामगारांना मिळालेले भांडे आणि मुलांची शिष्यवृत्ती हे सर्व यशोधन कार्यालयाच्या प्रयत्नांमुळेच शक्य झाले आहे.
- या संदर्भात असंघटित कामगार काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय कोल्हे यांनी देखील माहिती दिली. ते म्हणाले, बाळासाहेब थोरात आणि आमदार सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली यशोधन कार्यालयाने १२,६२७ कामगारांना सरकारी योजनांचा लाभ मिळवून दिला आहे. यामध्ये मुलांसाठी शिष्यवृत्ती, वैद्यकीय सुविधा आणि विमा योजनांचा समावेश आहे.
माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या ‘यशोधन’ कार्यालयाने १२ हजार असंघटित कामगारांना मिळवून दिला शासकीय योजनांचा लाभ
या संदर्भात असंघटित कामगार काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय कोल्हे यांनी देखील माहिती दिली.



संगमनेर – 



