संगमनेर –
घुलेवाडी (संगमनेर) येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये रुग्णांची हेळसांड होत असल्याने माजी सरपंच भास्करराव पानसरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आरोग्य सेवा ही ईश्वर सेवा असताना, रुग्णालयातील मेडिकल सुविधा आणि स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले जात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. जर या परिस्थितीत तातडीने सुधारणा झाली नाही, तर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
लोकनेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या पुढाकाराने संगमनेर तालुक्यातील नागरिकांना चांगली आरोग्य सुविधा मिळावी यासाठी घुलेवाडी येथे अद्ययावत ग्रामीण रुग्णालय उभारण्यात आले. मात्र, सध्या या रुग्णालयातील प्रशासनाचे काम समाधानकारक नसल्याचे पानसरे यांनी सांगितले.
रुग्णांना योग्य सुविधा मिळत नाहीत, त्यांच्या नातेवाईकांना कोणतेही योग्य मार्गदर्शन केले जात नाही, तसेच औषधांच्या बाबतीतही अरेरावी केली जाते, असे गंभीर आरोप त्यांनी केले. रुग्णालयातील अस्वच्छतेवर देखील त्यांनी चिंता व्यक्त केली.
या सर्व गंभीर बाबींवर तातडीने लक्ष देऊन रुग्णालयाच्या कामकाजात सुधारणा करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. अन्यथा, जनतेच्या हितासाठी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
संगमनेरच्या घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची हेळसांड; माजी सरपंच भास्करराव पानसरेंचा इशारा
या सर्व गंभीर बाबींवर तातडीने लक्ष देऊन रुग्णालयाच्या कामकाजात सुधारणा करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. अन्यथा, जनतेच्या हितासाठी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.



संगमनेर – 
रुग्णांना योग्य सुविधा मिळत नाहीत,

