संगमनेर –
संगमनेर शहरातील चंद्रशेखर चौकात नवरात्र उत्सव साजरा करण्यासाठी चंद्रशेखर हिंदू मंडळ आणि चंद्रशेखर चौक नवरात्र उत्सव समिती या दोन्ही मंडळांनी पोलिस प्रशासनाकडे परवानगी मागितली होती, परंतु शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता पोलिसांनी मोठा निर्णय घेत ही परवानगी नाकारली आहे. त्यामुळे यावेळी चंद्रशेखर चौकात उत्सव होणार की नाही हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल.
यावर्षी पोलीस प्रशासनाकडे चंद्रशेखर हिंदू मंडळ आणि चंद्रशेखर चौक नवरात्र उत्सव समिती या दोन्ही मंडळांनी दिनांक २२/०९/२०२५ ते ०२/१०/२०२५ या कालावधीत नवरात्र उत्सवाचे आयोजन करण्याचे नियोजन केले होते. मात्र, याच चौकात काही दिवसांपूर्वी झालेल्या हनुमान जयंती रथोत्सव मिरवणुकीमध्ये दोन गटांमध्ये झालेल्या वादामुळे दोन परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले होते.
हनुमान जयंती उत्सवावेळी घडलेल्या गुन्ह्याचा तसेच संगमनेर शहर व परिसरामध्ये घडलेल्या मागील काही घटना व सद्य परिस्थितीतील राजकीय जातीय व धार्मिक परिस्थितीचा विचार करता यंदा दोन्ही मंडळे एकाच ठिकाणी स्वतंत्रपणे कार्यक्रम आयोजित करत असल्यामुळे पुन्हा वाद होण्याची आणि गंभीर गुन्हा घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे पोलिसांनी म्हटले आहे.
पोलीस प्रशासनाने दोन्ही मंडळांना सामंजस्याने चर्चा करून नवरात्र उत्सव शांततेत साजरा करण्याचे आवाहन केले होते. यासंदर्भात संगमनेर शहर पोलीस स्टेशनकडून संबंधितांना दिनांक १६/०९/२०२५ रोजी पत्रही पाठवण्यात आले होते. तरीही दोन्ही मंडळांनी कोणत्याही प्रकारची सामंजस्याची भूमिका न घेता आपापले कार्यक्रम एकाच ठिकाणी आयोजित करण्यावर ठाम असल्याचं दिसून येत असल्याचे पोलीस प्रशासनाने म्हटले आहे.
त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून, पोलिसांनी दोन्ही मंडळांना नवरात्र उत्सवासाठी परवानगी नाकारली आहे. परवानगी नाकारल्यानंतरही जर मंडळांनी कार्यक्रम आयोजित केल्यास, त्यांच्यावर प्रचलित कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल आणि ही नोटीस न्यायालयात पुरावा म्हणून सादर केली जाईल, असा इशाराही पोलिसांनी दिला असून परवानगी नाकारत असल्याचे पत्र संबंधित मंडळाच्या प्रमुखांना दिले आहे.
कायदा सुव्यवस्थेच्या कारणास्तव पोलीस प्रशासनाने घेतलेल्या कठोर भूमिकेमुळे आता दोन्ही मंडळाकडून काय निर्णय घेतला जातो, या वादाला राजकीय वळण मिळते की पोलीस प्रशासनाच्या निर्णयाचे दोन्ही मंडळाकडून पालन केले जाते याकडे लक्ष लागले आहे.
हनुमान जयंती वादाचा परिणाम: चंद्रशेखर चौकातील नवरात्र उत्सवाला या कारणामुळे पोलिसांनी नाकारली परवानगी
पोलीस प्रशासनाने दोन्ही मंडळांना सामंजस्याने चर्चा करून नवरात्र उत्सव शांततेत साजरा करण्याचे आवाहन केले होते. यासंदर्भात संगमनेर शहर पोलीस स्टेशनकडून संबंधितांना दिनांक १६/०९/२०२५ रोजी पत्रही पाठवण्यात आले होते. तरीही दोन्ही मंडळांनी कोणत्याही प्रकारची सामंजस्याची भूमिका न घेता आपापले कार्यक्रम एकाच ठिकाणी आयोजित करण्यावर ठाम असल्याचं दिसून येत असल्याचे पोलीस प्रशासनाने म्हटले आहे.



संगमनेर –
हनुमान जयंती उत्सवावेळी घडलेल्या गुन्ह्याचा
कायदा सुव्यवस्थेच्या कारणास्तव पोलीस प्रशासनाने