
संगमनेर – मत चोरी ही संविधानद्रोही कृती असल्याचा आरोप करत, अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली “मत चोर, गद्दी छोड” स्वाक्षरी अभियान देशभरात सुरू केले आहे. या अभियानाचा शुभारंभ अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये संगमनेरमधून सोमवारी करण्यात आला.
अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सी.डब्ल्यू.सी.चे (वर्किंग कमिटी) सदस्य आणि राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत अहिल्यानगर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती विभागातर्फे ही सुरुवात करण्यात आली आहे.
यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. काँग्रेसच्यावतीने हाती घेतलेल्या या अभियानामुळे आगामी काळात मत चोरीच्या मुद्द्यावरून राज्यात आणि देशात काँग्रेसकडून तीव्र आंदोलन होण्याची शक्यता आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष बंटी यादव, प्रदेश महासचिव संजय भोसले, जिल्हा कार्याध्यक्ष अरुण गावित्रे, संगमनेर मर्चंट बँकेचे चेअरमन तथा जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र वाकचौरे, जिल्हा उपाध्यक्ष संतोष गायकवाड, जिल्हा काँग्रेसचे कायदेशीर सल्लागार तथा जिल्हा उपाध्यक्ष ॲड. प्रकाश संसारे, जिल्हा सरचिटणीस रामनाथ गायकवाड, जिल्हा सह सरचिटणीस शशिकांत थोरात, शेतकी संघाचे संचालक भाऊसाहेब खेमनर, जिल्हा सोशल मीडिया समन्वयक उदय अभंग, संगमनेर शहर अध्यक्ष सोनू गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष सोपान धेनक, राहाता तालुकाध्यक्ष साहिल म्हस्के, राहाता शहराध्यक्ष अमोल आरणे, कोपरगाव तालुका अध्यक्ष सोमनाथ पगारे, संगमनेर तालुका कार्याध्यक्ष दगडू साळवे, जिल्हा सचिव सुरज म्हंकाळे, जिल्हा सरचिटणीस नितीन साळवे, नवनिर्वाचित संगमनेर तालुका अध्यक्ष अशोक शेळके, रवींद्र शेळके, अजय चव्हाण, श्रवण गायकवाड, दादासाहेब शेळके, अशोक शेळके, चांगदेव खेमनर, भाऊराव सरबंदे, रमेश भोसले, शिरीष गायकवाड, विकास बोरुडे, युवराज पारडे आदी काँग्रेस पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
♦ मतदार यादीतील कथित गैरप्रकारांवरून काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी आवाज उठवला आहे. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी लोकसभा निवडणुकीसाठी वापरल्या गेलेल्या मतदार यादीतील त्रुटी उघडकीस आणत थेट केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवरच आक्षेप घेतला आहे. यानंतर निवडणूक आयोगाने मतदार याद्यांबाबत मोठा निर्णय घेतला असला तरी, ‘मत चोरी झालीच कशी?’ हा यक्षप्रश्न कायम आहे. खासदार गांधी यांच्या नेतृत्वाखाली या विरोधात देशभर स्वाक्षरी अभियान सुरू करण्यात आले आहे. – अरुण गावित्रे, जिल्हा कार्याध्यक्ष, अनुसूचित जाती विभाग.




यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
यावेळी जिल्हाध्यक्ष बंटी यादव, प्रदेश महासचिव संजय भोसले, जिल्हा कार्याध्यक्ष अरुण गावित्रे,

