महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन
संगमनेर – तुम्ही दररोज इतरांच्या घरात काम करतात. साफसफाई, स्वयंपाक, सेवा, मोठ्या-मोठ्या बंगल्यांमध्ये तुम्ही स्वच्छता करता, पण स्वतःच्या राहण्यासाठी छत नाही, हे अन्यायकारक आहे. तुमचंही एक स्वप्न आहे ‘आपलं स्वतःचं घर असावं!’ हे स्वप्न आम्ही नक्की पूर्ण करू. पंतप्रधान आवास योजना, बांधकाम कामगार योजना आणि राज्य सरकारच्या विविध गृह योजनांमधून प्रत्येक पात्र महिलेला घर मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू असून ज्यांना घर नाही, जे भाड्याच्या घरात राहतात त्या सर्वांना पुढील दोन वर्षांत संगमनेरमध्ये घर मिळवून देऊ असे आमदार सत्यजित तांबे यांनी महिलांना आश्वस्थ केले.
आमदार सत्यजीत तांबे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र कामगार संघटनेच्यावतीने संगमनेरचे अध्यक्ष सचिन साळुंखे यांच्या माध्यमातून आज (मंगळवारी, १४ ऑक्टोंबर) प्रांत कार्यालय येथे निवेदन देण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने महिला कामगार उपस्थित होत्या. तसेच गटविकास अधिकारी प्रवीण सिनारे, नगर परिषदेच्या प्रभारी मुख्याधिकारी धनश्री पवार तसेच प्रांत कार्यालयाचे अधिकारी उपस्थित होते.
आमदार तांबे यांनी आपल्या भाषणात महिलांच्या जीवनाचा भावनिक शब्दांत उल्लेख केला. तसेच गुंजाळवाडी, घुलेवाडी आणि सुकेवाडी परिसरातील सरकारी जमिनींच सर्वेक्षण सुरू करण्यात आल आहे. या जमिनींवर सोसायटीच्या माध्यमातून घरकुल प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रत्येक महिलेला सोसायटीच सदस्यत्व मिळणार असून नियमानुसार लॉटरी पद्धतीने घरांचे वाटप करण्यात येईल.
शहरात प्लॉट उरले नाहीत, पण आजूबाजूच्या गावांमध्ये सरकारी जमिनी आहेत. त्या जमिनी कलेक्टर साहेबांशी चर्चा करून गृहयोजनेसाठी मिळवू. तीन एकर जागेवर बहुमजली गृहनिर्माण प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पात महिलांसाठी सुरक्षित निवास, मुलांसाठी खेळाचे गार्डन व अंगणवाडी आणि स्वच्छतेच्या आधुनिक सुविधा असतील.
तुमचं नुकसान वाया जाणार नाही. तुम्ही आज काम सोडून आलात, तुमचा वेळ आणि मेहनत आम्हाला माहीत आहे. त्या त्यागाचं आम्ही मोल देऊ, असे त्यांनी यावेळी उपस्थित महिलांना आश्वस्त केले.
- २००७ मध्ये मी जिल्हा परिषद सदस्य असताना त्या काळात संजय गांधी नगर आणि राजीव गांधी नगर येथील जमिनी जिल्हा परिषदेकडून नगरपालिकेकडे वर्ग करण्यात आल्या होत्या. जेणेकरून घरकुल योजनेसाठी त्यांचा वापर करता येईल. परंतु उच्च बांधकाम खर्च आणि तात्पुरत्या निवासाच्या अडचणींमुळे तो प्रकल्प थांबला होता. आता तोच प्रकल्प नव्या जोमाने सुरू करण्याचा निर्धार आमदार तांबे यांनी व्यक्त केला.
आमदार तांबे यांनी संगमनेरच्या कष्टकरी महिलांना आश्वस्त केले : ‘तुमच्या त्यागाचं मोल देऊ!’ महिलांसाठी बहुमजली गृहनिर्माण प्रकल्प! गुंजाळवाडी, घुलेवाडी आणि सुकेवाडी परिसरात जागेच सर्व्हेक्षण सुरु; 2007 मधील रखडलेला गृहनिर्माण प्रकल्पही पुन्हा सुरु करणार! ‘संजय-राजीव गांधी नगर’ योजनेलाही नवा आयाम
तुमचं नुकसान वाया जाणार नाही. तुम्ही आज काम सोडून आलात, तुमचा वेळ आणि मेहनत आम्हाला माहीत आहे. त्या त्यागाचं आम्ही मोल देऊ, असे त्यांनी यावेळी उपस्थित महिलांना आश्वस्त केले.



महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन
आमदार तांबे यांनी आपल्या भाषणात महिलांच्या जीवनाचा भावनिक शब्दांत उल्लेख केला.
तुमचं नुकसान वाया जाणार नाही.