संगमनेर – आमदार सत्यजीत तांबे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे संगमनेरमधील कष्टकरी आणि बेघर कुटुंबांना आता स्वतःचे हक्काचे घर मिळण्याच्या प्रशासकीय कामांना मोठा वेग आला आहे. आज (सोमवारी, २७ ऑक्टोबर) आमदार तांबे यांनी येथील उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात एक महत्त्वपूर्ण बैठक घेऊन या गृहनिर्माण प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेतला. बेघरांना त्वरित घर देण्यासाठी शासकीय पातळीवर तातडीने कार्यवाही सुरू झाली असल्याची माहिती या बैठकीत मिळाली आहे.
बैठकीसाठी संगमनेरचे उपविभागीय अधिकारी अरुण उंडे, गटविकास अधिकारी प्रवीण सिनारे, संगमनेर नगर परिषदेच्या प्रभारी मुख्याधिकारी धनश्री पवार यांच्यासह महाराष्ट्र कामगार संघटनेचे अध्यक्ष सचिन साळुंखे आणि मोठ्या संख्येने गरजू महिला उपस्थित होत्या.
प्रशासकीय पातळीवर सर्व संबंधित प्रलंबित कामांची माहिती घेऊन ती त्वरित पूर्ण करण्याचे निर्देश आमदार तांबे यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले. त्यांच्या या सकारात्मक भूमिकेमुळे संगमनेरच्या बेघर कष्टकरी वर्गात आनंदाचे आणि आशेचे वातावरण निर्माण झाले आहे.
दोन वर्षांत घर देण्याचा तांबेंचा निर्धार – बैठकीत आमदार सत्यजीत तांबे यांनी स्पष्ट केले की, पंतप्रधान आवास योजना, बांधकाम कामगार योजना आणि राज्य सरकारच्या विविध गृह योजनांच्या माध्यमातून प्रत्येक पात्र महिलेला घर मिळवून देण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. ज्यांना घर नाही, जे भाड्याच्या घरात राहतात त्या सर्वांना पुढील दोन वर्षांत संगमनेरमध्ये हक्काचे घर मिळवून देऊ, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या प्रकल्पासाठी गुंजाळवाडी, घुलेवाडी आणि सुकेवाडी परिसरातील सरकारी जमिनींचे तातडीने सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. या जमिनींवर सोसायटीच्या माध्यमातून गृहकुल प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नियमानुसार, प्रत्येक महिलेला सोसायटीची सभासदता मिळणार असून घरांचे वाटप पारदर्शकपणे लॉटरी पद्धतीने केले जाणार आहे.
तीन एकर जागेवर बहुमजली प्रकल्पाची योजना – आमदार तांबे यांनी यावेळी एक महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केली. ते म्हणाले, शहरात प्लॉट उरले नाहीत पण आजूबाजूच्या गावांमध्ये सरकारी जमिनी उपलब्ध आहेत. त्या जमिनी जिल्हाधिकारी साहेबांशी चर्चा करून गृहयोजनेसाठी मिळविण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. सुमारे तीन एकर जागेवर बहुमजली गृहनिर्माण प्रकल्प उभारण्यात येणार आहे.
या प्रकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे हा केवळ निवासाचा प्रकल्प नसेल, तर महिलांसाठी सुरक्षित निवास, मुलांसाठी खेळाचे गार्डन, अंगणवाडी आणि स्वच्छतेच्या आधुनिक सुविधांनी युक्त असा हा संपूर्ण गृहसंकुल असणार आहे, असे तांबे यांनी स्पष्ट केले.
संगमनेरातील ‘बेघर’ आता होणार ‘घरमालक’! आमदार सत्यजित तांबेंच्या प्रयत्नांमुळे गृहनिर्माण प्रकल्पाला वेग; दोन वर्षांत घर देण्याचा निर्धार! उपविभागीय कार्यालयात बैठक
जमिनी जिल्हाधिकारी साहेबांशी चर्चा करून गृहयोजनेसाठी मिळविण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. सुमारे तीन एकर जागेवर बहुमजली गृहनिर्माण प्रकल्प उभारण्यात येणार आहे.



संगमनेर – आमदार सत्यजीत तांबे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे संगमनेरमधील कष्टकरी आणि बेघर कुटुंबांना आता स्वतःचे हक्काचे घर मिळण्याच्या प्रशासकीय कामांना मोठा वेग आला आहे.
दोन वर्षांत घर देण्याचा तांबेंचा निर्धार –
तीन एकर जागेवर बहुमजली प्रकल्पाची योजना –