अहिल्यानगर – येथील सराफ बाजारातून तब्बल दोन किलोपेक्षा अधिक सोन्याचे दागिने आणि चोख सोने घेऊन सहा कारागीर बेपत्ता झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. चोरी गेलेल्या सोन्याची किंमत सुमारे १ कोटी १ लाख ५ हजार रुपये इतकी आहे.
सोनार कृष्णा जगदीश देडगावकर (वय ३२) यांनी सोमवारी (२७ ऑक्टोबर) कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. यावरून दिपनकर माजी, सोमीन बेरा ऊर्फ कार्तिक, सोमनाथ सामंता, आन्मेश दुलोई, सत्तु बेरा, आणि स्नेहा बेरा या सहा संशयित कारागीरांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
रविवारी (२६ ऑक्टोबर) सायंकाळी देडगावकर यांच्या दुकानात काम करणारा कारागीर दिपनकर माजी जागेवर नसल्याचे आढळले. तो लवकरच येतो असे म्हणाला, पण बराच वेळ उलटूनही तो आला नाही आणि त्यानंतर त्याचे तसेच इतर सर्व कारागीरांचे मोबाईल बंद लागले. कारागीर घरे कुलूपबंद करून सोन्याचे दागिने घेऊन पळून गेल्याचे चौकशीअंती उघड झाले.
फिर्यादी कृष्णा देडगावकर यांच्यासह प्रतीक देडगावकर, विजय जगदाळे, सागर गुरव, भरत शिराळकर, बरजहान शेख, प्रमोद गाडगे, आणि इम्रान अली या आठ सोनारांचे सोने चोरीस गेले आहे.
या कारागीरांनी गेल्या काही महिन्यांत सोनार व्यावसायिकांचा विश्वास संपादन करून लबाडीने ही चोरी केली. संशयितांचे पूर्ण पत्ते उपलब्ध नाहीत आणि त्यांचे मोबाईल बंद असल्याने तपासात अडचणी येत आहेत. कोतवाली पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी सांगितले की, कारागीरांचा शोध घेण्यासाठी पथके कार्यरत आहेत. या घटनेमुळे अहिल्यानगर सराफ बाजारात असुरक्षिततेची भावना वाढली आहे.
दोन किलो सोनं घेऊन सहा कारागीर पळाले; अहिल्यानगर सराफ बाजारात खळबळ
कोतवाली पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी सांगितले की, कारागीरांचा शोध घेण्यासाठी पथके कार्यरत आहेत.



अहिल्यानगर – येथील सराफ बाजारातून तब्बल दोन किलोपेक्षा अधिक सोन्याचे दागिने आणि चोख सोने घेऊन सहा कारागीर बेपत्ता झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. चोरी गेलेल्या सोन्याची किंमत सुमारे १ कोटी १ लाख ५ हजार रुपये इतकी आहे.
रविवारी (२६ ऑक्टोबर) सायंकाळी देडगावकर यांच्या दुकानात काम करणारा कारागीर दिपनकर माजी जागेवर नसल्याचे आढळले. तो लवकरच येतो असे म्हणाला, पण बराच वेळ उलटूनही तो आला नाही आणि त्यानंतर त्याचे तसेच इतर सर्व कारागीरांचे मोबाईल बंद लागले. कारागीर घरे कुलूपबंद करून सोन्याचे दागिने घेऊन पळून गेल्याचे चौकशीअंती उघड झाले. 
या कारागीरांनी गेल्या काही महिन्यांत सोनार व्यावसायिकांचा विश्वास संपादन करून लबाडीने ही चोरी केली. संशयितांचे पूर्ण पत्ते उपलब्ध नाहीत आणि त्यांचे मोबाईल बंद असल्याने तपासात अडचणी येत आहेत. कोतवाली पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी सांगितले की, कारागीरांचा शोध घेण्यासाठी पथके कार्यरत आहेत. या घटनेमुळे अहिल्यानगर सराफ बाजारात असुरक्षिततेची भावना वाढली आहे.