संगमनेर – शांत, सुसंस्कृत आणि वैभवशाली ओळख असलेल्या संगमनेर शहरात मागील एका वर्षापासून मोठ्या प्रमाणात अवैध धंदे आणि अस्वस्थता वाढली आहे. त्यातच, दादागिरी, दहशत आणि अमली पदार्थांची तस्करी या गंभीर विषयांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. राज्याचे काँग्रेसचे वरिष्ठ नेते, माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि यांनी या परिस्थितीबद्दल यापूर्वीच तीव्र चिंता व्यक्त केली होती, आणि आता अमली पदार्थांच्या तस्करीवर मोठी कारवाई झाल्याने त्यांची चिंता खरी ठरल्याचे स्पष्ट झाले आहे.
दीपावलीच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी संवाद साधताना लोकनेते थोरात यांनी संगमनेर तालुक्याला परिवार म्हणून जपल्याचे आणि सातत्याने विकास योजना राबवल्याचे सांगितले होते. शिक्षण, सहकार, ग्रामीण विकास आणि शेतीमधून तालुक्याला फुलवले. मात्र, सध्या संगमनेरमध्ये असलेले चिंतेचे वातावरण त्यांनी अधोरेखित केले. थोरात म्हणाले होते, ड्रग्स (अमली पदार्थ) हा विषय अत्यंत अवघड असून संगमनेरमध्ये या विषयाने प्रवेश केला आहे. ही अत्यंत चिंतेची बाब आहे.
थोरात यांनी तरुण पिढीच्या भविष्याबद्दल चिंता व्यक्त करत, त्यांच्या हाती काम देण्याऐवजी जातिवाद वाढवून राजकारण करणे चुकीचे असल्याचे म्हटले होते. अमली पदार्थांच्या सेवनाने तरुणाईचे भविष्य अंधकारमय होणार असल्याने त्यांनी पालक आणि तरुणांना अधिक सतर्क राहण्याचे आवाहन केले होते. पत्रकारांनी या गंभीर विषयावर आवाज उठवावा आणि नागरिकांनी सजग राहावे, असे आवाहनही त्यांनी केले होते.
दरम्यान थोरात यांनी व्यक्त केलेल्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर, दोन दिवसांपूर्वी संगमनेरमध्ये अमली पदार्थांची तस्करी करताना मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या गंभीर प्रकरणामागे सत्ताधाऱ्यांचे पाठबळ असल्याची चर्चा शहरात जोर धरू लागली आहे, यामुळे या अवैध धंद्यांना राजकीय दबावातून चालना मिळत असल्याची शंका बळावली आहे. शांत संगमनेर शहराची घडी विस्कटल्यामुळे नागरिक हवालदिल झाले आहेत. या प्रकारांमुळे शहरातील शांतता आणि सुसंस्कृतता धोक्यात आली आहे.
‘ऑपरेशन क्लीन’ची गरज! अमली पदार्थांच्या तस्करीने संगमनेरकर अस्वस्थ; लोकनेते बाळासाहेब थोरात यांची चिंता खरी! अमली पदार्थांच्या वाढत्या तस्करीने शांतता भंग
माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी या परिस्थितीबद्दल यापूर्वीच तीव्र चिंता व्यक्त केली होती, आणि आता अमली पदार्थांच्या तस्करीवर मोठी कारवाई झाल्याने त्यांची चिंता खरी ठरल्याचे स्पष्ट झाले आहे.



संगमनेर – 
दरम्यान थोरात यांनी व्यक्त केलेल्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर,
