मोहसीन रशीद शेख
शहरात नगरपालिका निवडणुकीची चाहूल लागताच वातावरण पुन्हा रंगत आलं आहे. यावेळी मात्र रस्त्यांवर आणि सोशल मीडियावर अचानक उगवलेले “समाजसेवक” नागरिकांच्या चर्चेचा विषय ठरले आहेत. गेल्या काही वर्षांत जे चेहरे गल्ल्यांमधून गायब झाले होते, तेच आता पुन्हा “जनतेच्या सेवेसाठी” मैदानात उतरले आहेत.
प्रश्न एवढाच — ही सेवा समाजासाठी आहे की निवडणुकीसाठी?
प्रत्येक निवडणुकीच्या काळात असे हंगामी समाजसेवक सक्रिय होतात. काहीजण मदतीपेक्षा फोटो काढण्यात जास्त रस घेतात, तर काहींसाठी समाजसेवा म्हणजे फक्त पोस्टर, बॅनर आणि सोशल मीडियावरील प्रसिद्धी. “सेवा” हा शब्दच आजकाल ब्रँडिंगचा भाग झाला आहे.
खऱ्या अर्थाने समाजसेवा ही निस्वार्थ भावनेतून होते. ती निवडणुकीच्या तारखांवर अवलंबून नसते. पण आज परिस्थिती अशी आहे की, निवडणूक जवळ आली की शहरात अचानक विकासाचे, मदतीचे, आणि फोटोसेवेचे मोठमोठे प्रकल्प सुरू होतात — आणि मतदानानंतर पुन्हा शांतता असते.
असले निवडणुकीपुरते हंगामी समाजसेवक संगमनेरच्या जनतेने आता ओळखलं आहे की “सेवा आणि सेल्फी” यामध्ये फरक असतो. नागरिकांना नेहमीच काम करणारे निस्वार्थी लोक हवे आहेत — तेही बिनधास्त, बिनशब्दांच्या जाहिरातीशिवाय.
कारण समाजसेवा ही पाच वर्षांनी येणारी घटना नाही, ती दररोज जगायची जबाबदारी आहे. सध्या पावसाळ्यातील भूछत्रासारखे अचानक उगवलेले वार्डावार्डातील समाजसेवक जनतेच्या करमणूकीचा विषय बनलेत. निवडणुकीचे वारे वाहू लागले की शहरातील काही गल्ल्या-वार्डांमध्ये अशा हंगामी समाजसेवकांच्या “सक्रियतेचं” दृश्य दिसतंच. प्रश्न एवढाच निर्माण होतो की ही सेवा समाजासाठी आहे की खुर्चीसाठी? याचं उत्तर मात्र येणाऱ्या निवडणुकीत नागरिक देतील, हे नक्की.
नगरपालिका निवडणुकीची चाहूल लागताच हंगामी समाजसेवकांना आलाय ऊत – शहराला सेवा हवी, सेल्फी नाही; ही सेवा समाजासाठी आहे की निवडणुकीसाठी नागरिकांचा सवाल?
प्रश्न एवढाच — ही सेवा समाजासाठी आहे की निवडणुकीसाठी?





प्रत्येक निवडणुकीच्या काळात असे हंगामी समाजसेवक सक्रिय होतात.
असले निवडणुकीपुरते हंगामी समाजसेवक