संगमनेर – गेल्या काही वर्षांपासून नगरपालिका, नगरपंचायतीसह निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या भावी नगरसेवकांचा प्रचार समाज माध्यमातून सुरू झाला असला तरी प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर व माघारी नंतर निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे. अशा स्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या उलटलेल्या दोन दिवसांमध्ये अद्याप जिल्ह्यातील एकाही नगरपालिका, नगरपंचायतीसाठी इच्छुक उमेदवाराने नगराध्यक्ष अथवा सदस्य पदासाठी अर्ज दाखल केला नसल्याची माहिती देण्यात आली आहे.
सध्या संभाव्य इच्छुकांनी समाज माध्यमातून आपल्या उमेदवारीचा प्रचार सुरू केला आहे. मात्र प्रत्यक्षात एकही उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने सध्या तरी संभाव्य नगरसेवक सोशल मीडिया पुरते मर्यादित राहिले आहे. इच्छुकांची संख्या मोठी असल्याने पक्षश्रेष्ठीं समोर उमेदवारी देताना मोठे पेच निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर बंडखोरीची शक्यता देखील ‘बंडोबां’कडून व्यक्त केली जात आहे.
गल्लो गल्ली प्रभाग निहाय इच्छुकांची संख्या अधिक असली तरी प्रत्यक्षात उमेदवारी अर्ज दाखल करताना होणारे दमचाक लक्षात घेता तसेच थकित करांचा भरणा करताना अनेक जण मेटाकुटीला आले आहे. एखाद्या गल्लीत रस्त्याने जाताना नुसता ‘मेंबर’ एवढा आवाज दिला तरी दोन-चार इच्छुक लोक लगेच नजरेस पडतात.
अशी आहे गेल्या दोन दिवसातील उमेदवारी अर्जांची स्थिती…
नगरपालिका, नगरपंचायत निवडणूक : अशी आहे जिल्ह्यातील उमेदवारी अर्जांची स्थिती, आज होता उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा दुसरा दिवस!
या पार्श्वभूमीवर बंडखोरीची शक्यता देखील 'बंडोबां'कडून व्यक्त केली जात आहे.



संगमनेर – गेल्या काही वर्षांपासून नगरपालिका, नगरपंचायतीसह निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या भावी नगरसेवकांचा प्रचार समाज माध्यमातून सुरू झाला असला तरी
सध्या संभाव्य इच्छुकांनी समाज माध्यमातून आपल्या उमेदवारीचा प्रचार सुरू केला आहे.

