संगमनेर – ग्रामीण भागामध्ये बिबट्यांचा संचार मोठ्या प्रमाणात वाढल्याने विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन जिल्हा परिषदेच्या शाळांच्या वेळेत बदल करण्याची सूचना जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली असल्याची माहिती दिली.
डिग्रस येथील जिल्हा परिषदेच्या शाळा खोल्यांच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार अमोल खताळ, सरपंच अशोक खेमनर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
मंत्री विखे पाटील म्हणाले की, बिबट्यांकडून हल्ले होण्याच्या वाढत्या घटनांमुळे आणि अनेक विद्यार्थी लांबून एकटे येत असल्याने त्यांच्या संरक्षणासाठी शाळांच्या वेळा बदलण्याचा प्रयत्न आहे. याचबरोबर, त्यांनी स्थानिक पातळीवर लांबच्या विद्यार्थ्यांसाठी वाहनाची व्यवस्था करणे आणि ग्रामरक्षक दल स्थापन करण्याचा पुढाकार घेण्याचे आवाहन केले.
त्यांनी शाळा इमारतीच्या कामाचे कौतुक केले, मात्र ग्रामपंचायतीने विद्यार्थ्यांसाठी स्वच्छतागृह बांधण्यास प्राधान्य देण्याची सूचना केली. तालुक्यात खताळ यांच्या माध्यमातून विकासकामे सुरू असून, जनतेने विकासासाठी परिवर्तन केले आहे.
यावेळी त्यांनी पाणीप्रश्नावर भाष्य करताना सांगितले की, निळवंडे धरणाचे पाणी आल्याने जिरायती भागाला दिलासा मिळाला असून, डिग्रस गावालाही या पाण्याचा लाभ कसा देता येईल, यासाठी अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.
राजकीय भूमिकेवर बोलताना ते म्हणाले की, महायुती सरकार लोकहिताचे निर्णय घेत आहे. अतिवृष्टीची सुमारे २३ कोटी रुपयांची मदत तालुक्याला मंजूर झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश महासत्ता बनत असून, बिहार निवडणुकीच्या निकालाने जनता विकासाच्या बाजूने असल्याचे सिद्ध झाले. त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली.
आमदार खताळ यांनी आपल्या भाषणात सांगितले की, गेल्या ४५ वर्षांत जे प्रश्न सुटले नाहीत, ते प्राधान्याने सोडवण्याचे काम सुरू आहे. त्यांनी ४० वर्षांत निधी न आणता आता खोटे श्रेय घेणाऱ्यांवर टीका केली.
बिबट्याच्या वाढत्या संचारामुळे शाळांच्या वेळेत बदल करण्याची सूचना: मंत्री विखे पाटील
आमदार खताळ यांनी आपल्या भाषणात सांगितले की, गेल्या ४५ वर्षांत जे प्रश्न सुटले नाहीत, ते प्राधान्याने सोडवण्याचे काम सुरू आहे. त्यांनी ४० वर्षांत निधी न आणता आता खोटे श्रेय घेणाऱ्यांवर टीका केली.



संगमनेर – 
त्यांनी शाळा इमारतीच्या कामाचे कौतुक केले,
आमदार खताळ यांनी आपल्या भाषणात सांगितले की,