अहिल्यानगर –
घारगांव (ता. संगमनेर) येथील मुळा नदीच्या पुलावरून फेकून दिलेल्या तीन महिने वय असलेल्या शिवांश उर्फ देवांश प्रकाश जाधव या बालकाचे खुनी अखेर जेरबंद झाले आहे. अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या सखोल तपासामध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे. शिवांशचे आई-वडील आणि अन्य एका व्यक्तीनेच त्याचा खून करून प्रेताची विल्हेवाट लावल्याचे निष्पन्न झाले आहे.
४ डिसेंबर रोजी सकाळी ०९.१६ वाजता आंबीखालसा येथील रहिवासी अशोक धोंडीराम माळी यांना मुळा नदीच्या पुलाखाली काटेरी झुडुपामध्ये अंदाजे ०३ ते ०४ महिन्यांच्या बालकाचा मृतदेह दिसला. या घटनेनंतर घारगांव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू रजि. नंबर ७४/२०२५, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १९४ प्रमाणे अकस्मात मृत्यू दाखल करण्यात आला होता.
सदर अनोळखी बालकाची ओळख पटवून या घटनेमागील सत्य बाहेर काढण्यासाठी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष पथक तयार करण्यात आले होते.
या तपास पथकामध्ये पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग, पोलीस अंमलदार गणेश लोंढे, संतोष खैरे, फुरकान शेख, दिपक घाटकर, राहुल डोके, अमृत आढाव, बाळासाहेब गुंजाळ, योगेश कर्डीले, प्रशांत राठोड, आणि महिला पोलीस अंमलदार भाग्यश्री भिटे यांचा समावेश होता. पथकाने घटनास्थळाची पाहणी केली असता हा प्रकार प्रथमदर्शनी घातपाताचा असल्याचे दिसून आले. गोपनीय माहिती आणि व्यावसायिक कौशल्याच्या आधारे तपास केला असता, मृतदेह विल्हेवाट लावण्यासाठी वापरलेली कार भोकरदन, जि. जालना येथील असल्याची माहिती प्राप्त झाली.
गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी कविता प्रकाश जाधव (वय ३२, रा. आव्हाणा, ता. भोकरदन, जि. जालना) या महिलेच्या नातेवाईकांनी बाळाचे छत्रपती संभाजीनगर येथे ऑपरेशन झाले असून त्याला ३-४ दिवसांत सोडणार असल्याची अफवा पसरवल्याची माहिती मिळवली.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी प्रकाश पंडित जाधव (वय ३७), त्याची पत्नी सौ. कविता प्रकाश जाधव (वय ३२), आणि हरिदास गणेश राठोड (वय ३२) या तिघांना ताब्यात घेतले. सखोल चौकशीत वडिलांनी (प्रकाश जाधव) आणि आईने (कविता जाधव) त्यांचा ०३ महिन्यांचा मुलगा शिवांश उर्फ देवांश याला हरिदास राठोड याच्या इर्टिका कारमधून बुधवारी (०३/१२/२०२५) पुण्याच्या दिशेने नेत असताना घारगांव परिसरामध्ये नदीच्या पुलाजवळ थांबवले.
बाळ बरे होणार नाही या कारणामुळे त्यांनी त्याला मारून फेकून देण्याच्या उद्देशाने बाळाचा गळा दाबून खून केला. त्यानंतर त्याचे अंगावरील कपडे काढून त्याला नग्न अवस्थेत नदीच्या पुलावरून खाली फेकून दिले असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
अकस्मात मृत्यूच्या तपासामध्ये मयताचा गळा आवळून खून केल्याचे निष्पन्न झाल्याने घारगांव पोलीस ठाण्यात गु.र.नं. ३७०/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०३(१), २३८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खून करून मृतदेहाची विल्हेवाट लावल्यानंतर गावात चर्चा होऊ नये म्हणून आरोपींनी बाळाचे ऑपरेशन छत्रपती संभाजीनगर येथे झाल्याचे भासविले आणि बाळाच्या आईला गावातील लोकांशी बोलणे टाळण्यासाठी वेगवेगळ्या देवदर्शनासाठी पाठवले होते.
आरोपींकडून खुनासाठी वापरलेली ५,००,०००/- रुपये किंमतीची इर्टिका गाडी (क्र. एम. एच. ०२. ई. एच. ५३५४) ताब्यात घेण्यात आलेली आहे. पुढील तपास घारगांव पोलीस ठाणे करीत आहेत.
हृदयद्रावक! ‘बरं न होण्या’च्या भीतीने आई-वडिलांनीच दाबला बाळाचा गळा; घारगावच्या हत्याकांडाचा अहिल्यानगर एलसीबीकडून उलगडा
बाळ बरे होणार नाही या कारणामुळे त्यांनी त्याला मारून फेकून देण्याच्या उद्देशाने बाळाचा गळा दाबून खून केला. त्यानंतर त्याचे अंगावरील कपडे काढून त्याला नग्न अवस्थेत नदीच्या पुलावरून खाली फेकून दिले असल्याचे त्यांनी सांगितले आहे.



अहिल्यानगर –
सदर अनोळखी बालकाची ओळख पटवून या घटनेमागील सत्य बाहेर
या माहितीच्या आधारे पोलिसांनी
आरोपींकडून खुनासाठी वापरलेली