संगमनेर –
शेतकरी कष्ट करून अन्न पिकवतो आणि जवान ऊन, वारा, पाऊस अशा कठीण परिस्थितीत सीमेवर देशाचे रक्षण करतो. या दोघांचेही देशातील नागरिकांच्या जीवनात मोठे महत्त्व आहे. ज्या युवकांना देशसेवेची संधी मिळाली, त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे काम करत आपल्या कुटुंबाचे आणि तालुक्याचे नाव मोठे करावे, सैनिकांचा आम्हा सर्वांना सार्थ अभिमान आहे, असे गौरवोद्गार काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी काढले.
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर शनिवारी (१३ डिसेंबर) संगमनेर तालुका युवक काँग्रेस व एकविरा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील सैन्यात आणि पोलीस दलात निवड झालेल्या ६१ तरुण-तरुणींचा आणि त्यांच्या पालकांचा भावपूर्ण सत्कार करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात, तालुकाध्यक्ष अजय फटांगरे, निखिल पापडेजा, लता गायकर, सुंदराबाई डुबे, विलास शिंदे, मेजर संदीप गुंजाळ, अशोक लांडगे, भास्कर शरमाळे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, किरण कानवडे, अभिजीत बेद्रे, विक्रम खबाले यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
निवड झालेल्या ६१ युवकांचा व त्यांच्या पालकांचा शाल, बुके आणि विशेषतः झाडांचे रोप देऊन सत्कार करण्यात आला. हा सन्मान केवळ नोकरी मिळवल्याबद्दल नसून, देशसेवेच्या महान कार्यासाठी केलेल्या कठोर परिश्रमाचे प्रतीक होता.
माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपल्या भाषणात सांगितले की, देशाचा सैनिक आणि शेतकरी यांच्या जीवावर देश उभा आहे. युवकांनी अत्यंत परिश्रम करून सैन्यामध्ये नोकरी मिळवली आहे. या निमित्ताने देशासोबतच जगामध्ये जाण्याची संधी मिळाली आहे. प्रामाणिकपणे काम करून आपल्या कुटुंबाचा आणि तालुक्याचा लौकिक वाढवा.
डॉ. जयश्रीताई थोरात यांनी युवकांचे अभिनंदन करताना सांगितले की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी तालुक्यातील युवकांना करिअरच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने काम केले आहे. नोकरीसाठी मोठी स्पर्धा असली तरी, खडतर परिश्रम करून या युवकांनी यश मिळवले आहे. त्यांनी तरुणांना व्यसनाधीनतेपासून दूर राहून करिअरवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला देत सैन्यामध्ये निवड होणे हे अत्यंत अभिमानास्पद आहे आणि संगमनेर तालुका हा आपला परिवार आहे. आपल्या परिवारातील विद्यार्थी सीमेवर जात आहेत, याचा अमृत उद्योग समूहालाही अभिमान आहे, असे त्या म्हणाल्या.
यावेळी निवड झालेल्या विविध युवकांनी आपले मनोगते व्यक्त करत या संधीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले, तर आभार प्रदर्शन तालुकाध्यक्ष अजय फटांगरे यांनी केले. यावेळी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपल्या मुला-मुलींच्या या गौरवाने पालकांचे डोळे आनंदाश्रूंनी भरून आले होते. संगमनेर तालुक्यासाठी हा दिवस अभिमानाचा आणि प्रेरणादायी ठरला.
सैन्यात निवड झालेल्या ६१ युवकांचा सन्मान: शेतकरी आणि जवान देशासाठी अत्यंत महत्त्वाचे, सैन्यात निवड झालेल्या सर्व युवकांचा तालुक्याला अभिमान! बाळासाहेब थोरात
आपल्या मुला-मुलींच्या या गौरवाने पालकांचे डोळे आनंदाश्रूंनी भरून आले होते. संगमनेर तालुक्यासाठी हा दिवस अभिमानाचा आणि प्रेरणादायी ठरला.



संगमनेर – 
यावेळी व्यासपीठावर कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात, तालुकाध्यक्ष अजय फटांगरे, निखिल पापडेजा, लता गायकर, सुंदराबाई डुबे, विलास शिंदे, मेजर संदीप गुंजाळ, अशोक लांडगे, भास्कर शरमाळे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, किरण कानवडे, अभिजीत बेद्रे, विक्रम खबाले यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
डॉ. जयश्रीताई थोरात यांनी युवकांचे अभिनंदन करताना सांगितले की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी तालुक्यातील युवकांना करिअरच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने काम केले आहे. नोकरीसाठी मोठी स्पर्धा असली तरी, खडतर परिश्रम करून या युवकांनी यश मिळवले आहे. त्यांनी तरुणांना व्यसनाधीनतेपासून दूर राहून करिअरवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला देत सैन्यामध्ये निवड होणे हे अत्यंत अभिमानास्पद आहे आणि संगमनेर तालुका हा आपला परिवार आहे. आपल्या परिवारातील विद्यार्थी सीमेवर जात आहेत, याचा अमृत उद्योग समूहालाही अभिमान आहे, असे त्या म्हणाल्या.