Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

यू डायस अहवाल: राज्यातील हजारो शाळा पायाभूत सुविधांअभावी अंधारात, डिजिटल शिक्षणाचा दावा ठरतोय फोल

July 17, 2026

कोतुळमध्ये ६ लाखांचा गुटखा व कार जप्त; पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाची मोठी कारवाई

July 17, 2026

आज, शुक्रवार १७ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 17, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » रब्बी पिके धोक्यात! युरियाच्या तुटवड्यावरून माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सरकारला फटकारले, राज्य सरकारकडे केली ही मोठी मागणी
राजकारण

रब्बी पिके धोक्यात! युरियाच्या तुटवड्यावरून माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सरकारला फटकारले, राज्य सरकारकडे केली ही मोठी मागणी

निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याचे मोठे आश्वासन दिले होते, मात्र सत्तेत आल्यानंतर या आश्वासनाचा सरकारला विसर पडल्याचे दिसत आहे.
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरJanuary 2, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी- 

राज्यात यंदा रब्बी हंगामासाठी निसर्गाची साथ लाभल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने पेरण्या केल्या आहेत. मात्र, पिके ऐन जोमात असतानाच राज्यात युरिया खताचा तीव्र तुटवडा निर्माण झाला असून, यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत माजी कृषिमंत्री तथा काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी राज्य सरकारवर कडक शब्दांत टीका केली आहे. “शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत न पाहता शासनाने तातडीने सर्वत्र युरिया उपलब्ध करून द्यावा,” अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे.

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, यावर्षी संगमनेर तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण समाधानकारक राहिले. यामुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा, मका या पिकांसह कांद्याचे उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांनी मोठी गुंतवणूक केली आहे. सध्या ही पिके उभारणीच्या अवस्थेत असून त्यांना युरिया खताची सर्वाधिक गरज आहे. परंतु, बाजारपेठेत युरिया उपलब्ध नसल्याने पिकांच्या वाढीवर परिणाम होत आहे. ही परिस्थिती अत्यंत चिंताजनक असून, जर वेळेत खत मिळाले नाही तर शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे.

खतांच्या उपलब्धतेबाबत बोलताना थोरात यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. बाजारात खरोखरच युरियाची कमतरता आहे की काही घटकांकडून जाणीवपूर्वक कृत्रिम टंचाई निर्माण केली जात आहे, याची सखोल चौकशी सरकारने करण्याची गरज आहे. संगमनेर तालुक्यासह जिल्ह्यातील आणि राज्यातील इतर भागांतही शेतकऱ्यांना खतासाठी वणवण करावी लागत आहे. कृषी विभागाने आणि संबंधित मंत्रालयाने या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून पुरवठा साखळी सुरळीत करावी, कारण शेतकऱ्यांची काळजी घेणे ही सरकारची प्राथमिक जबाबदारी आहे, असे त्यांनी ठणकावून सांगितले.

केवळ युरियाच नव्हे, तर शेतकऱ्यांच्या इतर प्रलंबित प्रश्नांवरही बाळासाहेब थोरात यांनी सरकारला लक्ष केले आहे. निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याचे मोठे आश्वासन दिले होते, मात्र सत्तेत आल्यानंतर या आश्वासनाचा सरकारला विसर पडल्याचे दिसत आहे. त्याचप्रमाणे, गेल्या काळात झालेल्या अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले, त्यांनाही अद्याप हक्काची नुकसान भरपाई मिळालेली नाही. सध्या शेतमालाला योग्य बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे, अशा परिस्थितीत सरकारने शब्द पाळत सरसकट कर्जमाफी जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी पुन्हा एकदा लावून धरली आहे.

काँग्रेस आघाडी सरकारच्या काळातील आठवण करून देताना थोरात म्हणाले की, आम्ही नेहमीच शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिले आणि कोणत्याही संकटात बळीराजाला वाऱ्यावर सोडले नाही. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे आणि त्याला मदत करणे हे राजकारण पलीकडचे कर्तव्य आहे. त्यामुळे सरकारने आता विलंब न करता प्रत्येक गावात आवश्यक तेवढा युरिया साठा पोहोचवावा, जेणेकरून रब्बी हंगाम यशस्वी होईल.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 326
बाळासाहेब थोरात महायुती सरकार मागणी युरिया टंचाई रब्बी पिके
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

राम मंदिरातील लूटमारीनंतर भाजपच्या राज्यात शैक्षणिक घोटाळा… नसलेल्या महाविद्यालयातून हजारो विद्यार्थ्यांना पदव्या

July 14, 2026

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या संगमनेर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर; अमर कतारी यांच्याकडे तालुकाप्रमुखपदाची धुरा, नव्या पदाधिकाऱ्यांमध्ये यांचा समावेश

July 14, 2026

‘दुर्गाताई, आता आत्मपरीक्षणाची गरज; लाभार्थ्यांना बाजूला करा!, ताईंवर चिखलफेक होत असताना काँग्रेसचे २८ नगरसेवक गप्प का? – शिवसेनेचे अमर कतारी यांचा महाविकास आघाडीला घरचा आहेर

July 11, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शिक्षण

यू डायस अहवाल: राज्यातील हजारो शाळा पायाभूत सुविधांअभावी अंधारात, डिजिटल शिक्षणाचा दावा ठरतोय फोल

By अनंत पांगारकरJuly 17, 20260

प्रवीण पुरो | मुंबई: राज्यात डिजिटल शिक्षण, स्मार्ट क्लासरूम आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) मोठ्या घोषणा…

कोतुळमध्ये ६ लाखांचा गुटखा व कार जप्त; पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाची मोठी कारवाई

July 17, 2026

आज, शुक्रवार १७ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 17, 2026

जिओ पेट्रोल पंपाच्या नावाखाली अहिल्यानगरच्या व्यावसायिकाला ८४ लाखांचा गंडा

July 16, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.