संगमनेर, प्रतिनिधी –
संगमनेर नगरपरिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. निवडणुकीचा निकाल लागूनही अद्याप आपल्या खर्चाचा अधिकृत हिशोब न देणाऱ्या १२ उमेदवारांना प्रशासनाने आता अखेरचा इशारा दिला आहे. येत्या २० जानेवारी २०२६ पर्यंत खर्चाचा तपशील सादर न केल्यास, या उमेदवारांवर निवडणूक आयोगाचा बडगा उगारला जाणार असून त्यांना कायमचे अपात्र ठरवण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
निवडणूक आयोगाच्या कडक नियमांनुसार, प्रत्येक उमेदवाराला निवडणुकीत झालेला पै-पैचा हिशोब विहित मुदतीत देणे कायद्याने बंधनकारक आहे. मात्र, संगमनेरमधील १२ उमेदवारांनी या नियमाकडे सपशेल दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. या बेजबाबदारपणामुळे संतप्त झालेल्या निवडणूक विभागाने आता शेवटची मुदत जाहीर केली आहे. संबंधित उमेदवारांनी आपला सविस्तर खर्च अहवाल तात्काळ जमा करावा, असे आदेश देण्यात आले आहेत.
प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, २० जानेवारीनंतर कोणत्याही सबबी ऐकून घेतल्या जाणार नाहीत. मुदतीनंतर येणारा कोणताही अहवाल स्वीकारला जाणार नाही आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या उमेदवारांची नावे थेट अपात्रतेसाठी राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवली जातील. भविष्यातील राजकीय कारकीर्द धोक्यात येण्यापूर्वी या उमेदवारांनी तातडीने हालचाली करणे गरजेचे आहे.
🟫 निवडणूक खर्च सादर न करणाऱ्या उमेदवारांमध्ये नगराध्यक्षपदाच्या एका उमेदवाराचा समावेश असून अन्य उमेदवारांनी नगरसेवकपदासाठी निवडणूक लढवली होती. मात्र निर्धारित वेळेत त्यांनी आपला खर्च चा हिशोब सादर केलेला नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी आता २० जानेवारी ही शेवटची संधी असून, त्यानंतर कोणतीही सबब ऐकून घेतली जाणार नाही आणि थेट कारवाईचा अहवाल वरिष्ठ पातळीवर पाठवला जाणार आहे.
संगमनेर नगरपरिषद निवडणूक: हिशोब द्या, अन्यथा अपात्र व्हा! १२ उमेदवारांना प्रशासनाचा ‘अल्टिमेटम’; २० जानेवारी हीच शेवटची संधी
प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, २० जानेवारीनंतर कोणत्याही सबबी ऐकून घेतल्या जाणार नाहीत. मुदतीनंतर येणारा कोणताही अहवाल स्वीकारला जाणार नाही



संगमनेर, प्रतिनिधी –



