संगमनेर, प्रतिनिधी –
शिबलापूर ग्रामपंचायत कार्यालयातील घंटागाडीची दुरावस्था आणि महापुरुषांच्या प्रतिमा गोदामात फेकून दिल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आल्यानंतर, याविरोधात कायदेशीर लढा देणारे तक्रारदार संजय तबाजी मंतोडे यांना अखेर मोठे यश मिळाले आहे. सुरुवातीला तक्रारदारालाच खोटे ठरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ग्रामपंचायत प्रशासनाने अखेर लेखी माफीनामा सादर करत आपली चूक मान्य केली आहे. या निर्णयामुळे सत्य समोर आले असून परिसरातून समाधान व्यक्त होत आहे.
संगमनेर तालुक्यातील शिबलापूर ग्रामपंचायतीमध्ये महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान होत असल्याची आणि शासकीय मालमत्तेची हेळसांड होत असल्याची तक्रार संजय मंतोडे यांनी प्रशासनाकडे केली होती. ‘महाराष्ट्र संवाद न्यूज’ने या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून वस्तुस्थिती मांडणारी बातमी प्रसिद्ध केली होती.
मात्र, ही बातमी समोर आल्यावर संबंधित अधिकारी आणि काही पदाधिकाऱ्यांनी आपली चूक सुधारण्याऐवजी तक्रारदारालाच बदनाम करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये काहींनी पोलीस आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांसोबत घटनास्थळी जाऊन ‘काहीच घडले नाही’ असे भासवण्यासाठी फोटो सेशन केले होते. जुने फोटो केवळ सुरक्षित ठेवल्याचा दावा करत तक्रारदाराला खोटे ठरवण्याचा घाट घातला गेला होता.
मात्र, संजय मंतोडे आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. त्यांनी तहसीलदार, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आणि पोलीस प्रशासनाकडे उपोषणाचा इशारा दिला होता. तक्रारदाराकडे असलेले ठोस पुरावे आणि त्यांचा आक्रमक पवित्रा पाहून अखेर ग्रामपंचायत प्रशासनाने माघार घेतली. सरपंच, ग्रामसेवक आणि जबाबदार पदाधिकाऱ्यांनी मंतोडे यांची भेट घेऊन लेखी माफीनामा सुपूर्द केला. या पत्रात प्रशासनाने स्पष्टपणे नमूद केले की, संबंधित प्रकार अनावधानाने घडला असून त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. तसेच यापुढे अशा प्रकारची चूक होणार नाही आणि तक्रारदाराने सुचवलेल्या सूचनांचे पालन केले जाईल, अशी ग्वाही देखील देण्यात आली.
ग्रामपंचायतीने लेखी माफी मागितल्यानंतर आणि भविष्यात महापुरुषांचा अवमान होणार नाही असे आश्वासन दिल्यानंतर, संजय मंतोडे यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देऊन आपले उपोषण मागे घेतले. ‘महाराष्ट्र संवाद न्यूज’ने दिलेली बातमी ही पूर्णपणे सत्यावर आधारित होती, हे आता या लेखी माफीनाम्यामुळे सिद्ध झाले असून सत्याचा विजय झाला आहे.
शिबलापूर ग्रामपंचायतीचा झुकला कणा; महापुरुषांच्या अवमानप्रकरणी लेखी माफी, संजय मंतोडेंचा लढा यशस्वी! ‘महाराष्ट्र संवाद न्यूज’च्या वृत्तावर शिक्कामोर्तब
ग्रामपंचायतीने लेखी माफी मागितल्यानंतर आणि भविष्यात महापुरुषांचा अवमान होणार नाही असे आश्वासन दिल्यानंतर, संजय मंतोडे यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देऊन आपले उपोषण मागे घेतले.



संगमनेर, प्रतिनिधी –
मात्र, ही बातमी समोर आल्यावर संबंधित अधिकारी आणि काही पदाधिकाऱ्यांनी आपली चूक सुधारण्याऐवजी तक्रारदारालाच बदनाम करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये काहींनी पोलीस आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांसोबत घटनास्थळी जाऊन ‘काहीच घडले नाही’ असे भासवण्यासाठी फोटो सेशन केले होते. जुने फोटो केवळ सुरक्षित ठेवल्याचा दावा करत तक्रारदाराला खोटे ठरवण्याचा घाट घातला गेला होता.



