मुंबई (वडाळा) –
शेतजमीन आणि घराच्या वादातून दोन नातेवाईकांनी एका महिलेला शिवीगाळ करत अंगावर धावून गेल्याची घटना वडाळा येथे घडली आहे. याप्रकरणी वडाळा पोलिसांनी संगमनेर आणि बारागाव नांदूर येथील दोन व्यक्तींविरुद्ध अदखलपात्र गुन्हा (NCR) नोंदवला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला सुमन रामदास वाघमारे आणि आरोपी हे एकमेकांचे नातेवाईक आहेत. त्यांच्यामध्ये मूळ गावी असलेली शेतजमीन आणि मुंबईतील घरावरून गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरू आहे. हा वाद सध्या न्यायालयात प्रलंबित आहे.
गुरुवारी (२२ जानेवारी २०२६) सकाळी १० वाजेच्या सुमारास, तक्रारदार महिला त्यांच्या घराशेजारी राहणाऱ्या अजय नावाच्या व्यक्तीच्या घरी गेल्या होत्या. त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या किशोर दादू वाघमारे (वय ४६) आणि कैलास बाबूराव पवार (वय ४७) यांनी जुन्या वादाचा राग मनात धरून तक्रारदारांना शिवीगाळ केली.
या घटनेनंतर पीडित महिलेने तात्काळ वडाळा पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी या तक्रारीची दखल घेत किशोर वाघमारे आणि कैलास पवार यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ११५(२), ३५२ आणि ३(५) अंतर्गत अदखलपात्र गुन्हा (NCR No. 0051/2026) दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.
कौटुंबिक वादातून शिवीगाळ; दोन नातेवाईकांविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल
याप्रकरणी वडाळा पोलिसांनी संगमनेर आणि बारागाव नांदूर येथील दोन व्यक्तींविरुद्ध अदखलपात्र गुन्हा (NCR) नोंदवला आहे.



मुंबई (वडाळा) –
या घटनेनंतर पीडित महिलेने तात्काळ वडाळा पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी या तक्रारीची दखल घेत किशोर वाघमारे आणि कैलास पवार यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ११५(२), ३५२ आणि ३(५) अंतर्गत अदखलपात्र गुन्हा (NCR No. 0051/2026) दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.

