संगमनेर, प्रतिनिधी –
शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी नेहमीच सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या कर्तृत्वावर विश्वास टाकला. त्यांच्याच विचारांची पुण्याई आहे की, एक सामान्य रिक्षाचालक महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो आणि शेतकरी कुटुंबातील व्यक्ती आमदार होते. हाच वारसा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थपणे पुढे नेत आहेत, असे प्रतिपादन शिवसेना शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी यांनी केले.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त संगमनेर बस स्थानक येथे भव्य अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी शिवसेनाप्रमुखांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले आणि त्यांच्या जयघोषाने बस स्थानक परिसर दणाणून गेला होता. संगमनेरचे विद्यमान आमदार अमोल खताळ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहर शिवसेनेच्या वतीने हा सोहळा पार पडला.
सूर्यवंशी पुढे म्हणाले की, शिवसेनेने आजवर अनेक सामान्य माणसांच्या आयुष्यात सत्तेचे सोने केले आहे. राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे पूर्वी सर्वसामान्य रिक्षाचालक होते, मात्र बाळासाहेबांच्या विचारांमुळे ते आज राज्याचे नेतृत्व करत आहेत. शिवसेनेच्या आजच्या अनेक मंत्री, आमदार आणि खासदारांचा प्रवास पाहिला तर लक्षात येते की, त्यापैकी कोणी भाजी विक्रेता, कोणी टपरी चालक, कोणी वॉचमन तर कोणी सामान्य शेतकरी कुटुंबातील होते. संगमनेरचे आमदार अमोल खताळ पाटील हे देखील एका सामान्य शेतकरी कुटुंबातून येऊन आज विधानसभेत नेतृत्व करत आहेत, हे केवळ शिवसेनाप्रमुखांच्या धोरणामुळेच शक्य झाले. आज शिवसेना महाराष्ट्र आणि केंद्रात सत्तेत असून राज्याचा क्रमांक दोनचा सर्वात मोठा पक्ष म्हणून उभा आहे, याचा सार्थ अभिमान प्रत्येक शिवसैनिकाला आहे.
या सोहळ्याला संगमनेर नगरपालिकेच्या विद्यमान नगरसेविका साक्षी सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच रमेश काळे, अजित जाधव, रोहित चौधरी, वरद बागुल, अंकुश जेधे, तन्मय नेवासकर, अवधूत आहेर, कृष्णा हासे, सौरभ देशमुख, सुशील शेवाळे, सनी धारणकर, अक्षय दिघे, समर्थ कट्यारे, अनिकेत चांगले, सिद्धार्थ तूरकुणे, मुन्ना जोशी, अंबादास अनमल, दिपाली वाव्हळ, उषा कपिले, मेघना जेधे, शिवज्ञा अरगडे आणि शिवसेनेचे इतर सर्व स्तरातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.







