Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

कौठेमलकापूर सौरऊर्जा प्रकल्पाला स्थगिती; औद्योगिक वसाहतीचा मार्ग मोकळा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश; आमदार अमोल खताळ यांच्या मागणीला यश

23/08/2026

‘ग्रंथराज ज्ञानेश्वरी’ हे नैराश्यावरील प्रभावी औषध; संगमनेरमध्ये व्याख्यानमालेचा उत्साहात शुभारंभ

23/08/2026

संगमनेर येथे ३० ऑगस्टला ‘लोकनेते बाळासाहेब थोरात गुणगौरव पुरस्कार’ सोहळा; विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह २० शिक्षकांचा होणार सन्मान

23/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » ‘स्वराज’ शब्द दादाभाई नवरोजींनीच भारतीय राजकारणात रुजवला; ॲड. अनिल नौरीया यांचे प्रतिपादन
महाराष्ट्र संवाद विशेष

‘स्वराज’ शब्द दादाभाई नवरोजींनीच भारतीय राजकारणात रुजवला; ॲड. अनिल नौरीया यांचे प्रतिपादन

दुर्दैवाने, मुंबईचे सुपुत्र असूनही वर्सोवा येथील त्यांच्या जन्मस्थानाचा ठावठिकाणा आज कोणालाही माहीत नाही.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar13/02/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी –
भारतीय राजकारणात ‘स्वराज’ हा शब्द सर्वप्रथम प्रचलित करण्याचे कार्य दादाभाई नवरोजी यांनी केले. दादाभाईंनी केलेली ब्रिटिशांच्या आर्थिक शोषणाची मीमांसा हाच भारतीय राष्ट्रवादाचा खरा पाया आहे, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील आणि प्रसिद्ध राजकीय भाष्यकार ॲड. अनिल नौरीया यांनी केले.
ॲड. नौरीया पुढे यांनी दादाभाई नवरोजी आणि महात्मा गांधी यांच्यातील वैचारिक व भावनिक नाते उलगडताना त्यांनी या गौरवशाली इतिहासाचा विसर पडत असल्याबद्दल तीव्र खंत व्यक्त केली. दादाभाई नवरोजींच्या इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद गुजराती, मराठी, उर्दू आणि बंगाली अशा विविध भाषांमध्ये झाला होता, ज्यातून त्यांच्या विचारांचा प्रसार देशभर झाला.
त्यांच्या लोकप्रियतेचा प्रत्यय तेव्हा येत असे, जेव्हा ते दिल्लीला जात असताना रेल्वेच्या दोन्ही बाजूंनी लोक त्यांच्या स्वागतासाठी गर्दी करत. लाहोरमध्ये तर त्यांचे स्वागत ‘हिंद का दादा’ अशा शब्दांत करण्यात आले होते. महात्मा गांधींसाठी दादाभाई हे पितृतुल्य होते आणि स्वतः गांधीजींनी त्यांच्यासाठी ‘महात्मा’ हे संबोधन वापरले होते, याची आठवणही त्यांनी करून दिली.
दुर्दैवाने, मुंबईचे सुपुत्र असूनही वर्सोवा येथील त्यांच्या जन्मस्थानाचा ठावठिकाणा आज कोणालाही माहीत नाही. ४ सप्टेंबर २०२५ रोजी दादाभाई नवरोजी यांची द्विजन्मशताब्दी होती, मात्र मुंबई महापालिका, महाराष्ट्र सरकार, केंद्र सरकार किंवा स्वातंत्र्यलढ्याचा वारसा सांगणाऱ्या कोणत्याही राजकीय पक्षाला आणि संघटनेला याचे स्मरण नसावे, ही खेदाची बाब आहे. राष्ट्र हे लोकांच्या सामुहिक स्मृतीतून घडत असते, परंतु सध्या समाजाला स्मृतीभ्रंश झाला असून त्यातूनच हिंदुत्ववाद फोफावत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाप्रसंगी राष्ट्र सेवा दलाचे माजी कार्याध्यक्ष राजा अवसक, माजी जिल्हा परिषद सदस्य सीताराम राऊत, पिंपळगाव माथा सरपंच सविताताई पांडे, ॲड. निशाताई शिवूरकर, सुरेखा उबाळे, जुबेर इनामदार, प्रा. शिवाजी गायकवाड, लोकपंचायतचे विश्वस्त सारंग पांडे, जयसिंग सहाणे, दत्ता ढगे, रजत अवसक, मोहसीन शेख आणि ॲड. ऋषिकेश म्हस्कुले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 278
अनिल नौरिया दादाभाई नवरोजी व्याख्यान
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

‘ग्रंथराज ज्ञानेश्वरी’ हे नैराश्यावरील प्रभावी औषध; संगमनेरमध्ये व्याख्यानमालेचा उत्साहात शुभारंभ

23/08/2026

शिक्षित वस्तीच्या मध्यभागी अंधश्रद्धेचा अघोरी खेळ: संगमनेरमधील घुलेवाडीत तांत्रिक प्रकारांमुळे खळबळ, सीसीटीव्ही फुटेज तपासून कारवाई करण्याची नागरिकांची मागणी

22/08/2026

कुंभेफळ परिसरात बिबट्याची दहशत: ३ वर्षीय चिमुकल्यावर हल्ला, नागरिकांच्या प्रसंगावधानाने बालकाचे प्राण वाचले

22/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

कौठेमलकापूर सौरऊर्जा प्रकल्पाला स्थगिती; औद्योगिक वसाहतीचा मार्ग मोकळा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश; आमदार अमोल खताळ यांच्या मागणीला यश

By Annant Ppangarkar23/08/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर : संगमनेर तालुक्यातील पठारभागातील कौठे मलकापूर येथे प्रस्तावित औद्योगिक वसाहतीसाठी…

‘ग्रंथराज ज्ञानेश्वरी’ हे नैराश्यावरील प्रभावी औषध; संगमनेरमध्ये व्याख्यानमालेचा उत्साहात शुभारंभ

23/08/2026

संगमनेर येथे ३० ऑगस्टला ‘लोकनेते बाळासाहेब थोरात गुणगौरव पुरस्कार’ सोहळा; विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह २० शिक्षकांचा होणार सन्मान

23/08/2026

रविवार विशेष लेख — अर्बन नक्षल ते दिमागी नक्षल

23/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.