संगमनेर, प्रतिनिधी –
श्रीरामपूर आरटीओ कार्यालयातील अधिकारी ‘मार्च एंडिंग’चे टार्गेट पूर्ण करण्यासाठी किरकोळ कारणांवरून ४ ते ८ हजार रुपयांपर्यंत अवाढव्य दंड आकारून गरिबांच्या तोंडचा घास हिरावत असल्याचा आरोप करत, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रणित ‘वाहतूक सेना’ आणि ‘रिक्षा सेने’च्या वतीने तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. या अन्यायकारक दंडवसुलीविरोधात १ मार्चपासून संगमनेर शहर व तालुक्यात ‘रिक्षा बंद’ करण्याचा निर्धार रिक्षाचालकांनी व्यक्त केला आहे.
वाढती स्पर्धा आणि इंधन दरवाढीमुळे आधीच मेटाकुटीला आलेल्या रिक्षाचालकांना आता प्रादेशिक परिवहन विभागाच्या जाचक दंडवसुलीचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूक सेनेचे जिल्हाप्रमुख इम्तियाज शेख आणि तालुकाप्रमुख अशोक बढे यांनी प्रशासनावर खळबळजनक आरोप केले आहेत. आरटीओ अधिकारी ४ हजार रुपयांचा दंड सांगून प्रत्यक्षात एजंटमार्फत कोणतीही पावती न देता ८ ते १० हजार रुपये लाच स्वरूपात उकळत असल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे.
रिक्षाचालकांचे मासिक उत्पन्न अवघे १५ हजार रुपये असताना, एका महिन्याच्या कमाईपेक्षा जास्त दंड आकारणे ही ‘हुकूमशाही’ असल्याची भावना व्यक्त होत आहे. गाडीचे पासिंग नसणे, एखादा अतिरिक्त प्रवासी असणे किंवा पीयूसी/एनओसी नसल्यास ताकीद देण्याऐवजी थेट रिक्षा जप्त केल्या जात असल्याने चालकांमध्ये तीव्र संताप आहे.
या आंदोलनाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी सकारात्मक पाऊल उचलत अपक्ष आमदार सत्यजित तांबे आणि आमदार अमोल खताळ या दोन्ही लोकप्रतिनिधींना त्यांच्या संपर्क कार्यालयात प्रत्यक्ष भेटून निवेदन दिले. दोन्ही आमदारांनी या प्रकरणाची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांना देखील या निवेदनाची प्रत देण्यात आली आहे. याशिवाय या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरटीओ अहिल्यानगर आणि पोलीस उपविभागीय अधिकारी यांनाही माहितीसाठी पाठवण्यात आल्या आहेत.
शिवसेनेचे (उबाठा) जिल्हाप्रमुख सचिन कोते पाटील, उपजिल्हाप्रमुख अमर कतारी यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हाप्रमुख (वाहतूक सेना) इम्तियाज शेख, संगमनेर शहरप्रमुख फैसल शेख, तालुकाप्रमुख भाऊसाहेब हासे, शहरप्रमुख अमित चव्हाण, आश्वी ग्रामीण तालुकाप्रमुख प्रकाश गायकवाड, उपजिल्हा संघटक रंगनाथ फटांगरे आणि भीमाशंकर पावसे यांची प्रमुख उपस्थिती होती.
तसेच उपतालुकाप्रमुख संजय सोनवणे, दत्तू नाईक, रवींद्र गिरी, व्यापारी आघाडीचे शहर प्रमुख संभव लोढा, अमोल डुकरे, शानू शेख, रफिक शेख, महमूद सय्यद, परवेज शेख, रहीम बेग, दीपक वनम, माघाडे यांच्यासह रिक्षा सेना आणि रिक्षा चालक-मालक संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. विषय गंभीर तेथे ठाकरेंचे शिवसैनिक खंबीर असा नारा देत, जर ही दंडवसुली तात्काळ थांबली नाही, तर संगमनेर शहर पोलीस स्टेशन येथे ‘ठिय्या आंदोलन’ छेडले जाईल, असा इशारा अशोक बढे यांनी दिला आहे.
आरटीओच्या ‘दंडेलशाही’विरोधात संगमनेरचे रिक्षाचालक आक्रमक; ठाकरे गटाचा १ मार्चपासून ‘रिक्षा बंद’चा इशारा
या आंदोलनाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी सकारात्मक पाऊल उचलत अपक्ष आमदार सत्यजित तांबे आणि आमदार अमोल खताळ या दोन्ही लोकप्रतिनिधींना त्यांच्या संपर्क कार्यालयात प्रत्यक्ष भेटून निवेदन दिले.


संगमनेर, प्रतिनिधी –
शिवसेनेचे (उबाठा) जिल्हाप्रमुख सचिन कोते पाटील, उपजिल्हाप्रमुख अमर कतारी यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हाप्रमुख (वाहतूक सेना) इम्तियाज शेख, संगमनेर शहरप्रमुख फैसल शेख, तालुकाप्रमुख भाऊसाहेब हासे, शहरप्रमुख अमित चव्हाण, आश्वी ग्रामीण तालुकाप्रमुख प्रकाश गायकवाड, उपजिल्हा संघटक रंगनाथ फटांगरे आणि भीमाशंकर पावसे यांची प्रमुख उपस्थिती होती.


