Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

29/08/2026

स्थानिक गुन्हे शाखेकडून सराईत गुन्हेगाराला बेड्या

29/08/2026

एलसीबीची छापेमारी, २.९९ लाखांचा मुद्देमाल जप्त करत १४ आरोपींवर गुन्हा दाखल

29/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » पर्यावरण रक्षणात खांडगावचा राज्यात गौरव; ‘माझी वसुंधरा ४.०’ मध्ये ५० लाखांचे पारितोषिक
यश / निवड / पुरस्कार

पर्यावरण रक्षणात खांडगावचा राज्यात गौरव; ‘माझी वसुंधरा ४.०’ मध्ये ५० लाखांचे पारितोषिक

खांडगावने राबविलेले पर्यावरणपूरक उपक्रम आणि ग्रामस्थांच्या सक्रीय सहभागामुळे हा ऐतिहासिक क्षण अनुभवायला मिळाला आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar22/02/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी – 
पर्यावरण संवर्धन आणि निसर्ग रक्षणाच्या चळवळीत संगमनेर तालुक्यातील खांडगाव ग्रामपंचायतीने राज्याच्या नकाशावर आपली मोहोर उमटवली आहे. राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात आलेल्या ‘माझी वसुंधरा अभियान ४.०’ अंतर्गत २,५०० ते ५,००० लोकसंख्या गटात खांडगावने उत्कृष्ट कामगिरीचे प्रदर्शन केले. या यशाबद्दल गावाला राज्यस्तरीय पुरस्कार आणि ५० लाख रुपयांचे रोख पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
मुंबई येथील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियममध्ये या विशेष गौरव सोहळ्याचेआयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल आचार्य देवव्रत, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते खांडगावच्या पदाधिकाऱ्यांनी हा बहुमान स्वीकारला. खांडगावने राबविलेले पर्यावरणपूरक उपक्रम आणि ग्रामस्थांच्या सक्रीय सहभागामुळे हा ऐतिहासिक क्षण अनुभवायला मिळाला आहे.
या यशामागे सरपंच ॲड. विकास रावसाहेब गुंजाळ, उपसरपंच सुनील लक्ष्मण रुपवते यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्यांचे नियोजन महत्त्वाचे ठरले. तसेच मार्गदर्शक सोमनाथ नबाजी गुंजाळ, भरत भीमाशंकर गुंजाळ, लक्ष्मीबाई संपत गुंजाळ, रमेश विश्वनाथ अरगडे, गंगाताई प्रभाकर गुंजाळ, पद्मावती संजय गुंजाळ, अनिता आप्पासाहेब गुंजाळ, शोभा लक्ष्मण खरे आणि नयना विलास गुंजाळ या सर्वांनी या अभियानासाठी विशेष परिश्रम घेतले. प्रशासकीय पातळीवर ग्रामसेविका उज्ज्वला नवले आणि सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी केलेल्या अचूक नियोजनामुळेच खांडगावचा हा डंका राज्यस्तरावर वाजू शकला.
खांडगावच्या या दैदीप्यमान यशाची दखल राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही घेतली असून, त्यांनी ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांचे कौतुक करत पुढील विकासकामांसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. या पुरस्कारामुळे संपूर्ण संगमनेर तालुक्यात खांडगावचे विशेष कौतुक होत आहे.

📌 हा पुरस्कार गावातील प्रत्येक ग्रामस्थाचा, स्वच्छता सैनिकाचा आणि पर्यावरणासाठी झटणाऱ्या प्रत्येक हाताचा सन्मान आहे. गावातील विविध संस्था आणि ग्रामस्थांच्या एकजुटीमुळेच हे यश साध्य झाले असून, या पुरस्कारामुळे भविष्यात पर्यावरण रक्षणाची जबाबदारी अधिक वाढली आहे. — ॲड. विकास गुंजाळ सरपंच.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 606
खांडगाव ग्रामपंचायत पुरस्कार माझी वसुंधरा ४.०
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर येथे ३० ऑगस्टला ‘लोकनेते बाळासाहेब थोरात गुणगौरव पुरस्कार’ सोहळा; विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह २० शिक्षकांचा होणार सन्मान

23/08/2026

प्रवीण बागडे यांना ‘लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहित्यरत्न’ राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

18/08/2026

संगमनेर तालुका व शहर काँग्रेसच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर; अजय फटांगरे, सोमेश्वर दिवटे आणि अमोल शेलकर यांच्यावर मोठी जबाबदारी

18/07/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

By Annant Ppangarkar29/08/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर : नागरिकांना आपल्या परिसरातील समस्या आणि अडचणी थेट…

स्थानिक गुन्हे शाखेकडून सराईत गुन्हेगाराला बेड्या

29/08/2026

एलसीबीची छापेमारी, २.९९ लाखांचा मुद्देमाल जप्त करत १४ आरोपींवर गुन्हा दाखल

29/08/2026

देशहितासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी..; संगमनेरच्या वकिलाचे जगातील सर्वात उंच पोस्ट ऑफिसमधून थेट पत्र!

29/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.