Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

राम मंदिरातील लूटमारीनंतर भाजपच्या राज्यात शैक्षणिक घोटाळा… नसलेल्या महाविद्यालयातून हजारो विद्यार्थ्यांना पदव्या

July 14, 2026

‘टॉपटेन इम्पेरिअल’ इमारतीत प्रस्तावित वाईन शॉपच्या स्थलांतराला स्थानिक व्यावसायिकांचा तीव्र विरोध; आमदार अमोल खताळ यांना निवेदन

July 14, 2026

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या संगमनेर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर; अमर कतारी यांच्याकडे तालुकाप्रमुखपदाची धुरा, नव्या पदाधिकाऱ्यांमध्ये यांचा समावेश

July 14, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » ३३ केव्ही विद्युत वाहिनीच्या विरोधात गावकरी आक्रमक; धोकादायक वाहिनी न हटवल्यास आत्मदहनाचा इशारा
आंदोलन

३३ केव्ही विद्युत वाहिनीच्या विरोधात गावकरी आक्रमक; धोकादायक वाहिनी न हटवल्यास आत्मदहनाचा इशारा

चिखली येथे मोठे आंदोलनही उभारले होते. त्या वेळी महावितरणच्या अभियंत्यांनी १५ दिवसांची मुदत मागूनही ठोस कार्यवाही केलेली नाही.
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरApril 2, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

अहिल्यानगर, विशेष प्रतिनिधी
संगमनेर १३२ केव्ही सबस्टेशन ते धांदरफळ दरम्यान टाकण्यात आलेली ३३ केव्ही उच्चदाब विद्युत वाहिनी अत्यंत धोकादायक आणि बेकायदेशीर असल्याची तक्रार करत, बाधित गावकऱ्यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे. ही वाहिनी तातडीने सुरक्षित ठिकाणी न हलवल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा राम अरगडे, सतीश खताळ, अरुण चव्हाण आणि योगेश सातपुते यांच्यासह बाधित गावकऱ्यांनी दिला आहे.
निवेदनात नमूद केल्यानुसार, गेल्या दीड वर्षांपासून संगमनेर शहर, गुंजाळवाडी, राजापूर, मंगळापूर, चिखली आणि धांदरफळ या गावातील नागरिक या अन्यायाविरुद्ध संघर्ष करत आहेत. महावितरणने सुरुवातीला ही वाहिनी संगमनेर ते वाडापूर सबस्टेशनला जोडली जाणार असल्याचे सांगून दिशाभूल केली, मात्र प्रत्यक्षात ती चिखलीकडून धांदरफळच्या दिशेने खाजगी जागेतून नेण्यात आली आहे. प्रशासनाने या कामात हुकूमशाही गाजवून पोलिसांच्या बळाचा वापर करत गावकऱ्यांचा विरोध मोडून काढला आहे.
या कामाबाबत अनेक गंभीर तांत्रिक आणि कायदेशीर त्रुटी समोर येत आहेत. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आणि एमएसआरडीसीच्या कार्यक्षेत्रातील रस्त्यांचे मोजमाप न करताच हे काम पूर्ण करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, कोल्हार-घोटी या एमएसआरडीसीच्या रस्त्यालगत संगमनेर शहराला पाणीपुरवठा करणारी निळवंडे जलवाहिनी आहे. 
याच जलवाहिनीवर ३३ केव्हीचे विद्युत पोल धोकादायक पद्धतीने उभारले असून, यामुळे भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. संगमनेर नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी याबाबत महावितरणच्या अभियंत्यांशी दोनदा पत्रव्यवहार करूनही प्रशासनाकडून याकडे पद्धतशीरपणे दुर्लक्ष केले जात आहे.
बाधित गावातील ग्रामपंचायतींनी ग्रामसभेत ठराव घेऊन या कामाला अधिकृतपणे विरोध दर्शविला आहे. याप्रश्नी गावकऱ्यांनी महावितरण कार्यालयासमोर पाच दिवस उपोषण केले होते, तर चिखली येथे मोठे आंदोलनही उभारले होते. त्या वेळी महावितरणच्या अभियंत्यांनी १५ दिवसांची मुदत मागूनही ठोस कार्यवाही केलेली नाही. 
जिल्हाधिकारी यांनी स्वतः दोनदा पत्रव्यवहार करूनही अद्याप या वाहिनीचे तांत्रिक सर्वेक्षण करण्यात आलेले नाही. प्रशासनाच्या या उदासीनतेमुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी आता थेट आत्मदहनाचा इशारा दिला असून, न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. आता जिल्हा प्रशासन या गंभीर विषयावर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 820
33 केव्ही उच्चदाब ओव्हरहेड वीज वाहिनी चिखली जिल्हाधिकारी निवेदन
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

आधीच मुसळधार, त्यात दूषित पाण्याचा धोका! संगमनेर पालिकेच्या ढिसाळ कारभारावर विरोधी नगरसेविका साक्षी सूर्यवंशी कडाडल्या… मुख्याधिकाऱ्यांकडे केल्या ‘या’ मागण्या

July 9, 2026

अतिवृष्टीचा इशारा: अकोले तालुक्यातील शाळांना आज सुट्टी जाहीर, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

July 7, 2026

अयोध्येतील राम मंदिर दान चोरी प्रकरणी ‘झिरो एफआयआर’ नोंदवण्यासाठी पोलीस निरीक्षकांना निवेदन

July 6, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

राम मंदिरातील लूटमारीनंतर भाजपच्या राज्यात शैक्षणिक घोटाळा… नसलेल्या महाविद्यालयातून हजारो विद्यार्थ्यांना पदव्या

By अनंत पांगारकरJuly 14, 20260

विशेष प्रतिनिधी / मुंबई अयोध्येतील राम मंदिरातील देणगी चोरीचं प्रकरण ताजं असताना, त्याबद्दल रामभक्तांमध्ये संताप…

‘टॉपटेन इम्पेरिअल’ इमारतीत प्रस्तावित वाईन शॉपच्या स्थलांतराला स्थानिक व्यावसायिकांचा तीव्र विरोध; आमदार अमोल खताळ यांना निवेदन

July 14, 2026

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या संगमनेर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर; अमर कतारी यांच्याकडे तालुकाप्रमुखपदाची धुरा, नव्या पदाधिकाऱ्यांमध्ये यांचा समावेश

July 14, 2026

भाकरीच्या भुकेने आणि जगण्याच्या वेदनेतून निर्माण झालेले नारायण सुर्वे यांचे साहित्य माणसाला जगण्याची ताकद देते : ज्येष्ठ संपादक उत्तम कांबळे

July 14, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.