महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर:
क्रांतीसूर्य महात्मा बसवेश्वर यांची जयंती संगमनेर शहरात अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली. या मंगलमयी सोहळ्याची सुरुवात श्री. व सौ. तोरकडी यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेच्या भावपूर्ण आरतीने झाली. कार्यक्रमाचे पौरोहित्य चैतन्य लोणकर स्वामी यांनी केले. त्यांनी विधिवत पूजा संपन्न केल्याने संपूर्ण परिसरात धार्मिक व मांगल्याचे वातावरण निर्माण झाले होते.
याप्रसंगी मृणाल बागडे हिने महात्मा बसवेश्वर यांच्या जीवनप्रवासावर आणि त्यांच्या महान कार्यावर प्रकाश टाकणारे प्रभावी भाषण केले. बसवेश्वरांनी बाराव्या शतकात दिलेला समता, सामाजिक न्याय आणि शुद्ध मानवतेचा संदेश आजही कसा प्रस्तुत आहे, हे तिने आपल्या मनोगतातून उपस्थितांना पटवून दिले. त्यांच्या ‘कायकावे कैलास’ या तत्त्वज्ञानाचे महत्त्वही यावेळी विषद करण्यात आले.
या जयंती उत्सवासाठी लिंगायत जंगम समाजातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये सुभाष जंगम, ज्ञानेश्वर कथले, हेमंत तांदळे, दिलीप कबाडे, विलास लोणकर, बाळासाहेब जंगम, निलेश दिनकर, पूनम तांदळे, भीमाशंकर तांदळे, गणेश जंगम, निखिल तांदळे, संजय बागले, ज्ञानेश्वर वाकचौरे, दत्तात्रय मुर्तडक, अशोक लोणकर, सोमेश लोणकर आणि मंगेश सालपे यांच्यासह समाज बांधवांचा समावेश होता.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी महात्मा बसवेश्वर यांच्या क्रांतिकारी विचारांचे स्मरण करत, त्यांनी दाखवलेल्या समतेच्या आदर्शांचा आपल्या जीवनात अंगीकार करण्याचा संकल्प व्यक्त केला. या सोहळ्याने समाजातील एकोपा आणि भक्तीचा अनोखा संगम पाहायला मिळाला.





