Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज मंगळवार २३ जून २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

June 23, 2026

संगमनेरमध्ये एसीबीचा धमाका! मंडळ अधिकाऱ्याच्या नावाने ५ हजारांची लाच घेणारा खाजगी इसम रंगेहात जाळ्यात; गुन्हा दाखल

June 22, 2026

वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्या; आमदार अमोल खताळ यांचे प्रशासनाला निर्देश

June 22, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » सांस्कृतिक राजकारण उभे करण्यासाठी विद्रोही साहित्य संमेलनाची गरज; लोकशाहीर संभाजी भगत यांचे प्रतिपादन
सामाजिक

सांस्कृतिक राजकारण उभे करण्यासाठी विद्रोही साहित्य संमेलनाची गरज; लोकशाहीर संभाजी भगत यांचे प्रतिपादन

समृद्ध सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी प्रागतिक विचारांच्या लोकांनी एकत्र येणे आवश्यक आहे.
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरMay 8, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर:

आपल्याला सध्याच्या आव्हानात्मक परिस्थितीला तोंड देण्यासाठी पर्यायी सांस्कृतिक राजकारण उभे करावे लागेल. सामान्य लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि एक प्रबळ कृती कार्यक्रम आखण्यासाठी सर्व पक्ष आणि संघटनांच्या प्रमुखांनी एकत्र येणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन लोकशाहीर संभाजी भगत यांनी येथे केले. 

१५ व्या विद्रोही मराठी साहित्य संस्कृती संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल संगमनेर येथील डाव्या संघटनांच्या वतीने आयोजित जाहीर सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ साहित्यिक व ‘ताम्रपट’ कादंबरीचे लेखक प्रा. रंगनाथ पठारे यांच्या हस्ते संभाजी भगत यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना प्रा. पठारे म्हणाले की, मराठी हीच खऱ्या अर्थाने राष्ट्रभाषा असून १३०० ते १७०० हा काळ मराठी साहित्याचा सुवर्णकाळ होता. आपला हा समृद्ध सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी प्रागतिक विचारांच्या लोकांनी एकत्र येणे आवश्यक आहे. वारकरी संप्रदायाचा खरा पाया संत नामदेवांनी रचला असून त्यांचे साहित्य संपूर्ण भारतभर पसरलेले आहे. संभाजी भगत हे अण्णा गव्हाणकर, शाहीर अमर शेख आणि अण्णाभाऊ साठे यांचा वारसा समर्थपणे पुढे चालवत आहेत, अशा शब्दांत त्यांनी भगत यांच्या कार्याचे कौतुक केले.

सत्काराला उत्तर देताना संभाजी भगत यांनी समाजातील विदारक परिस्थितीवर भाष्य केले. तत्त्वज्ञानाने प्रेरित झालेला माणूस कोणत्याही संकटावर मात करू शकतो, असे सांगून त्यांनी वारकरी संप्रदायाचा इतिहास हा विद्रोही इतिहास असल्याचे स्पष्ट केले. विठ्ठलाला जात नसते आणि याच जात विरहित वारकरी चळवळीतून प्रेरणा घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली, तर महात्मा फुलेंच्या विचारांतून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान घडवले. हाच विचार घेऊन आता आपल्याला नवी चळवळ उभी करावी लागेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. अजित नवले यांनी आपल्या भाषणात तरुण नेतृत्वाच्या गरजेवर भर दिला. सध्याचा काळ हा परीक्षेचा असून शेतकरी प्रश्न, बेरोजगारी आणि वाढती अराजकता यांच्या विरोधात विस्कळीत का होईना पण आंदोलने होत आहेत. ही सर्व आंदोलने एकत्र येणे गरजेचे आहे. जात निर्मूलनासाठी सांस्कृतिक चळवळीत शाहीरांची भूमिका महत्त्वाची असून, नवा विचार मांडण्याची हीच वेळ असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकावरून उद्भवलेल्या वादाचा निषेध करत, आमदार संजय गायकवाड यांच्या घरासमोर या पुस्तकाचे सामुदायिक वाचन करण्याचा निर्धारही व्यक्त केला.

या सोहळ्याला अ‍ॅड. मिनल देशमुख, अ‍ॅड. रंजना गवांदे आणि अ‍ॅड. किरण रोहोम यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ साथी राजाभाऊ अवसक यांनी केले, तर सूत्रसंचालन संजयकुमार शिंदे यांनी पार पाडले. हनुमंत उबाळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी युवा नेते रजत अवसक आणि दत्ता ढगे यांनी विशेष परिश्रम घेतले.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 266
अजित नवले रंगनाथ पठारे संभाजी भगत
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

राजकीय गद्दारीच्या विरोधात माकप राज्यभर तीव्र निदर्शने करणार: डॉ. अजित नवले

June 21, 2026

तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली… सरकारला थेट इशारा

June 17, 2026

यशोधन कार्यालयात ‘एसटी स्मार्ट कार्ड’ सुविधेचा शुभारंभ; ज्येष्ठ नागरिक व महिलांना प्रवासात मिळणार मोठी सवलत

June 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज मंगळवार २३ जून २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

By अनंत पांगारकरJune 23, 20260

आजचे राशिभविष्य ​मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा आणि ऊर्जेने भरलेला असेल. कार्यक्षेत्रात तुमच्या कामगिरीचे…

संगमनेरमध्ये एसीबीचा धमाका! मंडळ अधिकाऱ्याच्या नावाने ५ हजारांची लाच घेणारा खाजगी इसम रंगेहात जाळ्यात; गुन्हा दाखल

June 22, 2026

वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्या; आमदार अमोल खताळ यांचे प्रशासनाला निर्देश

June 22, 2026

संगमनेरमध्ये आंतरराष्ट्रीय आकाराच्या फुटबॉल मैदानाचे थाटात उद्घाटन; रिमझिम पावसात संगमनेरकरांनी लुटला ‘फुटबॉल फिव्हर’चा आनंद

June 22, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.