Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज मंगळवार २३ जून २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

June 23, 2026

संगमनेरमध्ये एसीबीचा धमाका! मंडळ अधिकाऱ्याच्या नावाने ५ हजारांची लाच घेणारा खाजगी इसम रंगेहात जाळ्यात; गुन्हा दाखल

June 22, 2026

वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्या; आमदार अमोल खताळ यांचे प्रशासनाला निर्देश

June 22, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » सत्ताधाऱ्यांकडून संगमनेरच्या शेतकऱ्यांचा विश्वासघात; इतिहासात प्रथमच तालुक्याला ‘शून्य’ टक्के पीक विमा
राजकारण

सत्ताधाऱ्यांकडून संगमनेरच्या शेतकऱ्यांचा विश्वासघात; इतिहासात प्रथमच तालुक्याला ‘शून्य’ टक्के पीक विमा

शेतकऱ्यांच्या या क्रूर थट्टेविरोधात आता संगमनेर तालुक्यातील सर्व गावांमधील शेतकरी एकवटले असून, आगामी काळात सरकारविरुद्ध तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरMay 8, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर:

महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात आणि विकास कामांत अग्रस्थानी असलेल्या संगमनेर तालुक्यावर सध्याच्या सत्ताधाऱ्यांकडून जाणीवपूर्वक अन्याय केला जात असल्याचा गंभीर आरोप आता शेतकरी वर्गातून होत आहे. विशेषतः पीक विम्याच्या वाटपात संगमनेर तालुक्याला पूर्णपणे डावलण्यात आले असून, तालुक्याच्या इतिहासात प्रथमच शेतकऱ्यांच्या पदरी ‘शून्य’ टक्के पीक विमा पडला आहे. हा प्रकार म्हणजे विद्यमान सत्ताधाऱ्यांनी संगमनेरच्या शेतकऱ्यांशी खेळलेला एक राजकीय डाव असल्याची टीका किसान काँग्रेसचे अध्यक्ष आनंद वर्पे यांनी केली आहे.

या संदर्भात आनंद वर्पे आणि तालुक्यातील शेतकऱ्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, संगमनेर तालुका हा भौगोलिकदृष्ट्या अत्यंत मोठा आणि विस्तारित आहे. पठार भाग, प्रवरा पट्टा आणि तळेगाव पट्टा अशा तीन विविध विभागांत विभागलेल्या या तालुक्याला माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली आजवर कायमच पीक विमा आणि इतर शासकीय मदतीचे कवच लाभले. मात्र, गेल्या दीड वर्षात राज्यातील बदललेल्या राजकीय समीकरणामुळे संगमनेरच्या विकासकामांना खीळ बसली असून, शेतकऱ्यांना मिळणाऱ्या हक्काच्या मदतीतही जाणीवपूर्वक अडथळे आणले जात आहेत.

अहिल्यानगर जिल्ह्यातील पीक विम्याच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास संगमनेरवर झालेला अन्याय स्पष्टपणे अधोरेखित होतो. जिल्ह्यात एकूण ११८ कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर झाला असून, त्यामध्ये शेजारील राहता तालुक्याला १३ कोटी, कोपरगावला ९ कोटी, एकट्या श्रीरामपूरला १७ कोटी, राहुरीला ६ कोटी आणि अकोले तालुक्याला १ कोटी रुपयांची मदत मिळाली आहे. मात्र, संगमनेर तालुक्याच्या वाट्याला एक रुपयाही न आल्याने सरकारची भूमिका संशयास्पद वाटत आहे.

सध्याचे लोकप्रतिनिधी आणि पालकमंत्री केवळ जाहिरातबाजी आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून विकासाचा आभास निर्माण करत असून, प्रत्यक्षात मात्र जमिनीवर कोणतेही ठोस काम दिसत नाही, अशी संतप्त भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

दुसरीकडे, तालुक्यात उन्हाळ्याची तीव्रता वाढल्याने पाणीटंचाईचे संकट गडद झाले आहे. अशा परिस्थितीत सत्ताधाऱ्यांकडून केवळ प्रसिद्धीसाठी काकडवाडी सारख्या ठिकाणी टँकर पाठवून लगेच बंद करण्यात आले. याउलट, राजहंस दूध संघाने सामाजिक बांधिलकी जपत पठार भागातील तहानलेल्या वाड्या-वस्त्यांवर पाणी पुरवून शेतकऱ्यांना आधार दिला आहे. धार्मिकता आणि जातीभेदाच्या नावाखाली राजकारण करून मूळ प्रश्नांना बगल दिली जात असल्याने सामान्य जनता होरपळून निघत आहे.

याच विषयावर बोलताना ज्येष्ठ शेतकरी पांडुरंग गुंजाळ यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. सध्या तालुक्यात विकासकामांच्या नावाखाली केवळ ‘टक्केवारी’चे राजकारण सुरू असून, टक्केवारी वाढली असली तरी सामान्य शेतकऱ्याची मात्र मोठी वाट लावली गेल्याची टीका त्यांनी केली आहे. शेतकऱ्यांच्या या क्रूर थट्टेविरोधात आता संगमनेर तालुक्यातील सर्व गावांमधील शेतकरी एकवटले असून, आगामी काळात सरकारविरुद्ध तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 687
अन्याय पिक विमा मदत
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

‘रेल्वेमंत्र्यांना नफा-तोट्यापलीकडचे गणित समजत नाही!’ नाशिक-पुणे रेल्वे रद्द केल्याने आमदार सत्यजीत तांबे यांचा संताप; जनआंदोलनाचा इशारा

June 19, 2026

ऑपरेशन टायगर हा महाराष्ट्रातील राजकारणाच्या इतिहासातला काळा दिवस – माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा संताप

June 18, 2026

ठाकरे गटाच्या ६ गद्दार खासदारांचे दिल्लीत लोटांगण; अखेर शिंदेशाहीत विलीन होणार! गद्दारांच्या यादीत शिर्डीचे खासदार!

June 17, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज मंगळवार २३ जून २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

By अनंत पांगारकरJune 23, 20260

आजचे राशिभविष्य ​मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा आणि ऊर्जेने भरलेला असेल. कार्यक्षेत्रात तुमच्या कामगिरीचे…

संगमनेरमध्ये एसीबीचा धमाका! मंडळ अधिकाऱ्याच्या नावाने ५ हजारांची लाच घेणारा खाजगी इसम रंगेहात जाळ्यात; गुन्हा दाखल

June 22, 2026

वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्या; आमदार अमोल खताळ यांचे प्रशासनाला निर्देश

June 22, 2026

संगमनेरमध्ये आंतरराष्ट्रीय आकाराच्या फुटबॉल मैदानाचे थाटात उद्घाटन; रिमझिम पावसात संगमनेरकरांनी लुटला ‘फुटबॉल फिव्हर’चा आनंद

June 22, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.